शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही

By admin | Updated: November 2, 2016 07:14 IST

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीचा भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही, असा विश्वास इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी व्यक्त केला.

मीरपूर : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीचा भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही, असा विश्वास इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी व्यक्त केला. बेलिस म्हणाले,‘भारत दौरा खडतर राहणार आहे, हे निश्चित. आम्हाला या दौऱ्यात चांगली कामगिरी करावी लागेल. यापूर्वीही आम्ही पिछाडीवर असताना शानदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो आहोत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध त्यांच्याच भूमीत खेळायचे असल्यामुळे आम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. यापूर्वीही इंग्लंड संघाने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन केले आहे. त्यामुळे या वेळी संघाकडून अशीच अपेक्षा आहे.’इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मालिका १-१ ने बरोबरीत संपली. इंग्लंडने यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या सर्व ९ कसोटी सामन्यांत विजय मिळविण्याची कामगिरी केली आहे; पण भारत दौऱ्यापूर्वी पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही प्रशिक्षक बेलिस यांनी संघ शानदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. बेलिस म्हणाले, ‘संघातील काही खेळाडूंचे स्थान धोक्यात आहे. त्यात गॅरी बॅलेन्सचाही समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध चार डावांत त्याला दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही. पाकविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बॅलेन्सची सरासरी ३० पेक्षा कमी होती, तरी त्याची बांगलादेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आली; पण तेथेही त्याला छाप सोडता आली नाही.’ (वृत्तसंस्था)