शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा बांगलादेशवर ४५ धावांनी विजय

By admin | Updated: February 24, 2016 22:48 IST

आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४५ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला १६७ धावांचे आव्हान दिले होते

ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. २४ -  आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४५ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या धडाकेबाज ८३ धावा आणि हार्दिक पांड्याच्या झटपट ३१ धावांच्या बळावर बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते.
 
 
भारतीय गोलंदाजानी अचूक टप्यावर गोलंदाजी करत भारताला ४५ धावांनी विजय मिळवून दिला. भारतातीय गोंलदाजापुढे बांगलादेश संघाला २० षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात १२१ धावाच बनवता आल्या. भारतार्फे अनुभवी नेहराने बांगलादेशच्या ३ फलंदाजाला बाद केले तर बुमरा, अश्विन आणि पांड्याने एका फलंदाजाला बाद केले.
 
 
आशिया चषकातील पहिला सामना जिंकून भारताने आपली सुरवात विजयाने केली आहे पण २७ तारखेस भारताला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करावयाचा आहे.
 
 
दरम्यान, आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होत. खराब सुरवातीनंतर रोहित शर्मोच्या (८३) धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने १६६ धावापर्यंत मजल मारली व बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित (रो'हिट') शर्माने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने तुफानी ८३ धावा केल्या.  
 
 
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने शेवटच्या हाणामारीच्या षटकात भारताला चांगली धावसंख्या जमवून दिली. पांड्याने १८ चेंडूत झटपट ३१ धावांचे योगदान दिले. त्यात त्याने ४ चौकार आणि एक षटकार लगावला.आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय फलंदाजानी खराब सुरवात केली, सामना सुरु झाल्या नंतर दुसऱ्या षटकात सलामीवीर शिखर धवन वैयक्तिक २ धावावर बाद झाला. सुरेश रैना १३ धावावर बाद झाला. तर संघाच्या २२ धावा असताना धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला मशरफी मुर्तजाने ८ धावावर बाद केले. कर्णधार धोणीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत २ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या 
 
 
रोहित शर्माने युवराजच्या सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण मोठा फटका मारण्याच्या नादात युवराज १५ धावावर बाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. शेवटची षटके असल्यामुले धोणी आपल्या आधी हार्धिक पांड्याला बडती दिली. पांड्याने फटकेबाजी करताना १८ चेंडूत ३१ धावा केल्या 
 
भारतात होणाऱ्या आगामी  विश्व टी-२० स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा वन-डे ऐवजी टी-२० फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहेत .
 
प्रतिस्पर्धी संघ
भारत :-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह
बांगलादेशचा संघ : 
इमरुल कैस, सौम्या सरकार, सब्बीर रेहमान, महमदुल्ला, शकीब अल हसन, मुशफिकूर रहीम (यष्टिरक्षक), मशरफी मोर्तझा (कर्णधार), महंमद मिथून, अल अमीन होसेन, मुस्तफिझूर रेहमान, टस्किन अहमद.