शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाला वेळ द्या

By admin | Updated: October 7, 2014 03:08 IST

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटीत काही करिष्मा दाखविता आलेला नाही. हा तरुण संघ आहे; परंतु त्यांनी लॉर्डस्वर विजय मिळवून इतिहास घडविला

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटीत काही करिष्मा दाखविता आलेला नाही. हा तरुण संघ आहे; परंतु त्यांनी लॉर्डस्वर विजय मिळवून इतिहास घडविला. अनुभवाची कमतरता असल्याने त्यांना इतर कसोटीत सपाटून मार खावा लागला. असे असले तरी या संघाला आणखी एक वर्ष द्यायला हवे आणि त्यांच्याकडून सकारात्मक निकाल मिळेल, असा विश्वास भारताचे माजी कर्णाधार रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गोलंदाज २० विकेट घेण्यात अपयशी ठरत असल्यास, फलंदाज काय करतील. त्यांनी कितीही धावा चोपल्या, तरी गोलंदाजांचे अपयश संघावर दबाव निर्माण करतो. त्यांना काही वर्षांची मुदत देण्याची आवश्यकता आहे.भारताला २० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची आवश्यकता आहे. कसोटीत भारतीय संघ नेममीच बॅड पॅचमध्ये नसेल. लोकांना लगेच विसर पडतो. १८ महिन्यांपूर्वी भारत कसोटीत अव्वल क्रमांकावर होता. टी-२० वर्ल्डकप आणि ५० षटकांचा वर्ल्डकप आपण जिंकलो. याचा विसर लोकांना पडला आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी मांडले. ते पुढे म्हणाले, क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये खेळाडूंना खेळायचे आहे. त्यांना प्रवाहासोबत जाणे आवडते आणि तो त्यांचा हक्क आहे. माझ्या मते, कसोटी क्रिकेट स्वत:च्या चुकांमुळे संघर्ष करत आहे. एकदिवसीय आणि टी-२० सामने बंद केल्यास कसोटीचाही प्राण जाईल. कारण त्यामुळे आर्थिक क्षमता ढासळेल. कसोटीला टी-२०च्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. ५० षटकांच्या आणि टी-२० वर्ल्डकपवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)