शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या कसोटीत सकारात्मकतेने खेळू

By admin | Updated: August 15, 2016 04:16 IST

१८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला.

ग्रोस इसलेट : ‘‘तिसरा कसोटी सामना जिंकून खूप आनंदी आहे. कारण या सामन्यातील एक दिवस पावसामुळे वाया गेला होता. आता १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला.‘‘पावसामुळे तिसरा दिवस वाया गेल्यानंतर पाचवा दिवस खेळणे खूप कठीण होते. येथे आम्ही अपेक्षित खेळ करण्यात अपयशी ठरलो. येथेही आम्ही दोन दिवस चांगला खेळ केला. त्यानंतर तिसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. पण, चौथ्या दिवशी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली,’’ असे कोहलीने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘भुवनेश्वरची कामगिरी शानदार होती. २४ षटकात २८ धावा देऊन ५ बळी घेणे जबरदस्त कामगिरी होती. यामुळे सामन्याचे चित्र पालटले. त्याचवेळी पहिल्या डावात अश्विन व साहा यांची शतके विसरता येणार नाही. त्यांनी निर्णायक कामगिरी केली.’’‘‘ठरवलेल्या रणनितीनुसार खेळ करुन आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो. आता त्रिनिदादमध्ये होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात सकारात्मक विचाराने मैदानात उतरु. शिवाय कोणत्या बाजूंवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे याची आम्हाला जाणीव आहे,’’ असेही कोहलीने यावेळी सांगितले. (वृतसंस्था)>आॅलिम्पियन्सचे समर्थनटीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व करीत असलेल्या भारतीय खेळाडूंचे समर्थन करताना इतर देशांच्या तुलनेत आपल्या खेळाडूंना उच्च दर्जांच्या सुविधा मिळत नसतानाही देशाचे खेळाडू जीव तोडून खेळत असल्याचे सांगितले. कोहली म्हणाला की, ‘‘खेळाडूंवर कठोर शब्दांत टीका केली जाऊ नये.’’ कोहली म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकसाठी खेळाडू कशाप्रकारे तयारी करीत असतात हे आपण पाहिले आहे. ते जीव तोडून यासाठी सज्ज होत असतात आणि जेव्हा काही लोक या बाजूकडे दुर्लक्ष करुन सरळ टीका करतात तेव्हा माझ्यामते ही अत्यंत दु:खद बाब आहे. क्रिकेटमध्येही तुम्ही प्रत्येक सामना किंवा मालिका जिंकू शकत नाही.’’>जमैका येथे झालेल्या कसोटी सामन्यात आम्ही कोणत्या चुका केल्या, याची जाणीव आम्हाला होती. तिसऱ्या सामन्यात त्याच चुका आम्ही सुधारल्या. चौथ्या दिवशी आम्ही ३१ धावांत ७ बळी घेतले. हीच कामगिरी सामना जिंकण्यास निर्णायक ठरली. आम्हाला परदेशामध्ये अधिकाधिक सामने जिंकायचे असून त्याकडे आमची वाटचाल सुरु झाली आहे.- विराट कोहली