शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूच्या ६ बाद २६१ धावा

By admin | Updated: January 2, 2017 00:37 IST

निराशाजनक सुरुवातीनंतर बाबा इंद्रजित व कौशिक गांधी यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे सावरलेल्या तामिळनाडूने अखेरच्या सत्रात तीन विकेट गमावल्यामुळे रणजी

राजकोट : निराशाजनक सुरुवातीनंतर बाबा इंद्रजित व कौशिक गांधी यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे सावरलेल्या तामिळनाडूने अखेरच्या सत्रात तीन विकेट गमावल्यामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीत रविवारी पहिल्या दिवसअखेर त्यांची ६ बाद २६१ अशी स्थिती झाली.
तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. धावफलकावर ६५ धावांची नोंद असताना त्यांची सलामीची जोडी तंबूत परतली होती. त्यानंतर इंद्रजित (६४) व गांधी (५०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर तामिळनाडूची पुन्हा घसरगुंडी उडाली. तामिळनाडूला आता मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी अनुभवी विजय शंकरवर आहे. तो ४१ धावा काढून खेळपट्टीवर आहे. त्याला दुसऱ्या टोकाकडून अश्विन क्राईस्ट (९) साथ देत आहे. मुंबईतर्फे अभिषेक नायर व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर बलविंदर सिंग संधू व विजय गोहिल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले.
त्याआधी, पहिला प्रथम श्रेणी सामना खेळणारा गंगा श्रीधर राजू (१६) आणि कर्णधार अभिनव मुकुंद (३८) यांनी सलामीला ४५ धावांची भागीदारी केली. राजूला नायरने माघारी परतवले, तर संधूने मुकुंदला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर इंद्रजित व गांधी यांनी डाव सावरला. इंद्रजितने ९० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. ही भागीदारी चहापानापूर्वी शार्दुलने तोडली. त्याने इंद्रजितला बाद केले. इंद्रजितने ११४ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार लगावले.
गांधीने तिसऱ्या सत्रामध्ये १३६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, त्याच षटकात नायरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याच्या अर्धशतकी खेळीत ८ चौकारांचा समावेश आहे.
शार्दुलने दिनेश कार्तिकला (१६) मोठी खेळी करण्याची संधी दिली नाही. बाबा अपराजितला (९) लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. त्यानंतर विजय शंकरने अश्विन क्राईस्टच्या साथीने दिवसअखेर गडी बाद होणार नाही, याची खबरदारी घेतली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ३० धावांची अभेद्य भागीदारी केली. विजय शंकरने ६२ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार लगावले.
त्याआधी, मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला प्रथम श्रेणी पदार्पणाची संधी मिळाली. (वृत्तसंस्था)