शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२०-टष्ट्वेन्टीला हवेत अष्टपैलू खेळाडू...

By admin | Updated: April 4, 2015 04:06 IST

चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून

विशाल शिर्के , पुणे चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट देखील वेगवान झाले असल्याचे यंदाच्या विश्वचषकात पाहायला मिळाले. आयपीएलची ही खासियत टिकवून ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापक देखील आता अधिक गुणवान क्रिकेट टॅलेंट शोधण्यासाठी पुढे येत आहेत. त्यासाठी अष्टपैलु खेळाडू घडविण्यावर अधिक भर दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे लेव्हल थ्री प्रशिक्षक राकेश शर्मा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला...आपले कौशल्य दाखविण्यासाठी स्थानिक क्रिकेटपटूंना आयपीएलच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटूंना या स्पर्धेने एका छताखाली आणले आहे. इतकेच काय तर स्थानिक क्रिकेटपटूंना महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, राहुल द्रवीड, ख्रिस गेल, रिकी पॉंटींग, विरेंद्र सेहवाग, यांसारख्या आजी-माजी खेळाडूंसमवेत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या खेळाडूंचे अनुभव विश्वदेखील समृद्ध होण्यास मदत होत आहे. तसेच ज्या खेळाडूंना केवळ पडद्यावरच खेळताना पाहिले आहे, त्यांच्या बरोबर बसण्याची मिळालेली संधी देखील खेळाडूचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत करते. शर्मा म्हणाले, टी-टष्ट्वेन्टी मुळे क्रिकेट फलंदाजांचा खेळ झाला आहे. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक संघाचा कल हा अष्टपैलु खेळाडू घडविण्याकडे असतो. कारण सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून वीस-पंचवीस धावा जमविल्यास संघाला ते फायदेशीर ठरु शकते. याचा अर्थ केवळ गोलंजाद हवा नसतो असे नाही. प्रत्येक सामन्यात सरासरी दोन बळी घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज, अथवा जॉन्टी ऱ्होड्स सारखा अफलातून क्षेत्ररक्षक असेल तरीही प्रतिस्पर्ध्यावर दडपण येतेच. त्यामुळे असा खेळाडू संघाना हवाच असतो. तसेच खेळाडू संघ अडचणीत असताना कशी कामगिरी करतो, दडपणात तो कसा खेळ कररु शकतो, केवळ फटकेबाजीचा विचार करतो की, फटका मारण्यास योग्य असलेल्या चेंडूची खेळाडू वाट पाहतो, याचाही विचार त्याची खेळाची पद्धत ठरविण्यास उपयोगी ठरते. एखादा खेळाडू जर सलग ३० ते ४० धावा काढून बाद होत असेल, तर तो लवकर आपला संयम घालवून बाद होतो की काय याचाही विचार केला जातो. त्या नुसार खेळाडूच्या कमकुवत बाजूवर काम केले जाते, असे शर्मा म्हणाले.