शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आम्हालाही मिळेल मायेचे छत्र?

By admin | Updated: November 14, 2014 01:33 IST

आई - वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण. परंतु आजही कित्येक अनाथ बालकांच्या नशिबी हे बालपण आलेले नाही.

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
आई - वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण. परंतु आजही कित्येक अनाथ बालकांच्या नशिबी हे बालपण आलेले नाही. त्यापैकी विकलांग बालकांच्या नशिबी ते येईल की नाही याबाबत शंकाच आहे. आवडीची  भाजी निवडल्याप्रमाणो दत्तक घेण्यासाठी मुले निवडली जात असल्याने विकलांग बालके बालआश्रमातच खिळून आहेत. 
समाजातील अनेक घटनांमुळे कुटुंबापासून वंचित झालेल्या बालकांना बालआश्रमात ठेवले जाते. त्यापैकी अनेकांच्या नशिबी कौटुंबिक वादातूनच बालआश्रमाचे छत लाभलेले असते. पोलिसांमार्फत कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून 
चाईल्ड वेल्फेअर कमिटीमार्फत ही मुले बालआश्रमात ठेवली जातात. तेथे या बालकांचे केवळ संगोपन 
होत असल्याने त्यांच्या आयुष्यात आई - वडिलांच्या प्रेमाची कमतरता असते. त्यातच जर बालक विकलांग असेल तर त्याला आई - वडिलांची माया मिळणो तितकेच अवघड 
आहे. त्यामुळे अशा विशेष 
बालकांचे संपूर्ण बालपण हे बालआश्रमातच जाते. जन्मत:च शारीरिक अथवा बौद्धिक वाढीच्या कमतरतेने ही बालके ग्रासलेली असतात. 
ठाणो जिल्हय़ात सध्या डोंबिवलीचे जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरूळचे विश्वबालक केंद्र या दोन बालआश्रमांमध्ये विशेष अनाथ बालके वाढत आहेत. नवजात शिशू अवस्थेपासून ते सहा वर्षार्पयतची बालके तेथे ठेवली जातात. सध्या दोनही संस्थांकडे एकूण 14 अनाथ विकलांग  बालके आहेत. तेथे त्यांना आवश्यक त्या सुविधा देखील मिळतात. मात्र आई - वडिलांचा मायेचा हआम्हालाही मिळेल मायेचे छत्र?
 
शासनाच्या पुढाकाराची गरज
विशेष बालकांच्या गरजा सामान्य बालकांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांना समजून घेणारी व्यक्तीही तितकीच तज्ज्ञ असायला हवी. त्यामुळे विकलांग अनाथ बालकांसाठी कार्य करणा:या समाजसेवी संस्थांचीही कमतरता आहे. त्याकरिता शासनानेच यात पुढाकार घेण्याची गरज आहे.
 
 
 
2 परंतु या विशेष बालकांचे संगोपन करण्यात बालआश्रमांना काही स्तरावर मर्यादा येतात. वयाच्या पाच वर्षापर्यंत बालआश्रमामध्ये या बालकांचे संगोपन केले जाते. मात्र त्यानंतर सहा वर्षावरील विकलांग बालकांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा प्रश्न संस्थांपुढे आहे. शारीरिक विकलांगत्व असल्याने या बालकांना कोणी दत्तकही घेत नसल्याचे संस्था चालकांचे म्हणणो आहे. 
3पाच वर्षावरील विकलांग बालकांच्या संगोपनासाठी ठाणो जिल्हय़ात शासनाची एकही (बालगृह) संस्था नाही. त्यामुळे सहा वर्षावरील बालके देखील बालआश्रमातच ठेवली जात आहेत. वाढत्या वयानुसार त्यांना फिजिओथेरपी, अॅक्युप्रेशर थेरपी, स्पीच थेरपी देणो देखील गरजेचे आहे. अशा सुविधा मिळाल्यास या बालकांमध्ये देखील शारीरिक व बौद्धिक विकास होणो शक्य आहे.