शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या खुल्या डीपींमुळे अपघातांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 22:48 IST

शहरातील पदपथांवरील खुल्या डीपींच्या दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नवी मुंबई : शहरातील पदपथांवरील खुल्या डीपींच्या दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे सतत दुर्घटना होत असून, त्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले आहेत, तर पदपथांवरील या डीपींमुळे पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.

महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. सर्वाधिक गैरसोय खुल्या केबल्स व पदपथांवरील डीपी यांच्यामुळे होत शॉक लागून आजवर अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न बाळगता महावितरणची कामे केली जात आहेत. अशाच प्रकारातून नुकतेच कोपरखैरणेत रस्त्यावरील वायरचा स्फोट होऊन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती. तर घणसोलीत एका घरासमोर वीज वाहिनी पेटल्याने तिथे खेळणारी लहान मुलगी जखमी झाली होती.अशा अनेक घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. यामुळे पदपथांवरील खुल्या डीपी तसेच निष्काळजी पणे रस्त्यावर व इतरत्र पडलेल्या वीजवाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत. सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे.

पुढील चार महिन्यांत महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून प्रभागातील रस्ते, पदपथ, गटारे आदीच्या दुरुस्तीकामावर जोर दिला आहे. या कामांमध्येही महावितरणच्या वायरींचा अडथळा ठरत आहे. गटारांमधून वायरी टाकलेल्या असल्याने गटारांचे खोदकाम करताना वायर तुटल्यास कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

प्रत्येक खोदकामा वेळी वीज वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडून सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी बैठ्या चाळीतील अथवा रो-हाउसच्या दारातच या विद्युत डीपी बसवण्यात आल्या आहेत. यामुळे घरासमोर खेळणाºया लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत; परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

शॉर्ट सर्किट होण्याचे प्रकार वाढले

महावितरणमुळे भेडसावणाºया या समस्यांमध्ये भविष्यात अधिकच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. दाब वाढल्याने अथवा खोदकामात वीजवाहिन्या तुटल्यास त्या ठिकाणी जोड लावून महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी सातत्याने वाहिन्या तुटल्याचे प्रकार घडत असल्याने अवघ्या ५० ते १०० मीटरच्या वाहिनीला तीनपेक्षा जास्त जोड लावण्यात आले आहेत. हे जोड उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवण्यात आलेले असल्याने त्यामध्ये पाणी जाऊन अथवा उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्या ठिकाणी आग लागण्याचेही प्रकार घडत आहेत. यानंतरही महावितरणकडून संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य घेतले जात नसल्याचे सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई