शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

एसआरटी पध्दतीने शेतीत बारीक तांदूळ पिकवावा

By admin | Updated: October 17, 2014 22:45 IST

भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो,

कर्जत : भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो, त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक - खाजगी भागीदारीतून आता एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून बारीक आकार असलेले तांदूळ पिकविण्याकडे शेतक:यांनी आपला कल ठेवावा,असे आवाहन राज्याचे कृषी विभागाचे भात पीक समन्वयक विजय कोलेकर यांनी शेतकरी मेळाव्यात केले.  राज्याच्या कृषी विभागाने प्रथमच सुरु  केलेल्या सार्वजनिक खाजगी भागीदार म्हणजे पीपीपी,याला भातपिकासाठी सगुणा राईस तंत्र म्हणजे एसआरटीचा प्रसार होण्यासाठी पुढाकार शासन घेत आहे. कर्जत तालुक्यात मोठय़ा प्रमाणात एसआरटीचा अवलंब शेतक:यांनी केला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी कृषी आयुक्त विभागाने एसआरटी पध्दतीने भात लागवडीच्या माहितीसाठी नेरळजवळील सगुणाबाग येथे शेतकरी मेळावा आयोजिला होता. यावेळी रायगड, ठाणो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात एसआरटी पध्दतीने शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.
भाताची मळणी कशी होते,याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली. यावेळी यशवंत गायकर, हरिश्चंद्र ठोंबरे, रवींद्र झांजे या कर्जत तालुक्यातील शेतक:यांसह मुरबाड येथील दत्तात्रय टोहके आणि आदिवासी शेतकरी परशुराम आगिवले, कृषी चित्रकार सोपान खाडे यांचा सगुणाबागच्यावतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
 
4एसआरटीमुळे शासनाचे सार्वजनिक, खाजगी भागीदार झाले आहेत, त्यांना राज्याच्या कृषी विभागामार्फत मदत केली जात आहे. ही मदत पन्नास टक्के अनुदानाने मिळणार असून भात मळणी यंत्रचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. पंजाब राज्यात भात मळणीसाठी उपयोगात येणारे तंत्रही शासनाने माहितीसाठी उपलब्ध केले