शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

घणसोलीतील सेंट्रलपार्कचा प्रशासनाला पडला विसर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 2:57 AM

घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही. यामुळे या सेंट्रल पार्कचा शासनाला विसर पडला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेने घणसोली येथे सेंट्रल पार्क विकसित केले आहे. त्याकरिता सावली गावातील काही घरे हटविण्यात आली होती. यामुळे सुरुवातीपासूनच हे पार्क वादात सापडले होते. त्यानंतर, प्रत्यक्षात पार्कच्या कामाला सुरुवात झाल्यानंतरही अनेक कारणांनी अडथळे निर्माण झाले होते. अनेक अडथळ्यांनंतर दोन वर्षांपूर्वी पार्कचे काम पूर्ण होऊनदेखील त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. यामुळे पार्कमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. येथील तरणतलावाची नियमित देखभालही प्रशासनाला डोईजड झाली आहे. हा नोड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर, घणसोलीकरांच्या सेंट्रल पार्ककडे नजरा लागल्या होत्या.लहान मुलांच्या खेळण्यासह, ज्येष्ठांचा विरंगुळा, तरणतला, स्केटिंग आदी सुविधा त्यामध्ये पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे लवकरात लवकर हे उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यानुसार, काही राजकीय व्यक्तींनी प्रशासनाने पार्क खुले न केल्यास, आपण ते खुले करू, अशा प्रकारच्या पोकळ घोषणा करून स्थानिकांच्या भावनांचा राजकीय वापर करण्याचाही प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात वापरायोग्य स्थितीत असलेले उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे धाडस कोणीच केले नाही. परिणामी, प्रशासनालादेखील उद्घाटनाचा विसर पडला असावा, असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.पार्कमध्ये तरणतलावासह, स्केटिंग, फुटबॉल टर्फ मैदान यासह लहान मुलांच्या विरंगुळ्याची साधने पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे या पार्कच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे, परंतु प्रशासन व सत्ताधारी यांच्या उदासीनतेमुळे लहान मुलांसह नागरिकांना कुंपणाबाहेरूनच पार्कमधील सुविधांचे दर्शन घ्यावे लागत आहे. या संदर्भात महापौर जयवंत सुतार व पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.सेंट्रल पार्क वापरासाठी खुले होत नसल्याने लहान मुलांची गैरसोय होते. तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले उद्यान धूळखात आहे. प्रशासनाने हे पार्क खुले करावे.- प्रकाश पाटील,रहिवाशी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई