शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीत वाहनांच्या माहितीसाठी ‘तलाश’

By admin | Updated: November 3, 2015 01:01 IST

नाकाबंदीदरम्यान अडवलेल्या संशयित वाहनांची संपूर्ण माहिती तिथल्या पोलिसांना काही क्षणातच मिळणार आहे. यासाठी ‘तलाश’ नावाचे अद्ययावत सॉफ्टवेअर कार्यरत करण्यात आले

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईनाकाबंदीदरम्यान अडवलेल्या संशयित वाहनांची संपूर्ण माहिती तिथल्या पोलिसांना काही क्षणातच मिळणार आहे. यासाठी ‘तलाश’ नावाचे अद्ययावत सॉफ्टवेअर कार्यरत करण्यात आले असून सोमवारपासून त्याची सुरवात करण्यात आली. यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देवून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकांना लगाम बसणार आहे.पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अडवलेल्या अनेक वाहन चालकांचे पोलिसांसोबत वाद होत असतात. वाहनावर अथवा चालकावर संशय असल्याने पोलिसांकडून ते वाहन वापरणाऱ्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची चौकशी केली जाते. अशावेळी ती व्यक्ती पोलिसांवरच रुबाब झाडत तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असते. नाकाबंदीच्या ठिकाणी अनेकदा पोलीस व नागरिकांचे वाद सुरु असतात. शिवाय अडवलेले वाहन चोरीचे अथवा गुन्ह्यात वापरलेले असतानाही त्याची खोटी कागदपत्रे पोलिसांपुढे मांडून सराईत गुन्हेगार देखील सहज निसटत असतात. शिवाय शहरात घडणारी वाहनचोरी व मोटारसायकलवरून होणारी सोनसाखळी चोरी ही देखील पोलिसांची डोकेदुखी आहेच. त्यामुळे नाकाबंदी करुनही त्याठिकाणी गुन्हेगार पकडले जाण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. मात्र यापुढे पोलिसांनी अडवलेल्या संशयित वाहनाची संपूर्ण माहिती त्यांना अवघ्या अर्ध्या मिनिटात मिळणार आहे. याकरिता परिमंडळ १ चे उपायुक्त शहाजी उमाप यांनी अद्ययावत यंत्रणा अमलात आणली आहे. तलाश नावाचे सॉफ्टवेअर विकसित करुन त्या सॉफ्टवेअरला नाकाबंदीतल्या पोलिसांचे मोबाइल जोडलेले असणार आहेत. या पोलिसांनी संशयित वाहनाचा नंबर त्या सॉफ्टवेअरवर पाठवताच काही सेकंदात त्या वाहनाची व वाहन मालकाची माहिती त्या पोलिसाला त्याच्या मोबाइलवर मिळणार. एक पोलीस वाहन चालकासोबत बोलत असतानाच दुसरा पोलीस सहजरीत्या हे काम करु शकणार आहे. त्यामुळे संशयित व्यक्ती वाहनाची माहिती खोटी सांगत असल्यास त्याचे पितळ त्याच जागी उघड होणार आहे.एपीएमसी पोलीस ठाण्यात त्याचा विशेष कंट्रोल रुम तयार करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सरफरे हे त्याचे प्रमुख आहेत.कंट्रोल रुममधील संगणकातल्या तलाश सॉफ्टवेअरला ३०० अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाइल नंबर जोडले गेलेत. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त, दहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक व नाकाबंदीचे कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांना कोणत्याही संशयित वाहनाची माहिती सहज मिळावी यासाठी २००६ पासूनच्या राज्यातल्या १८ कोटी वाहनांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये संकलित केलेली आहे. शिवाय सॉफ्टवेअरची लिंक आरटीओला जोडली असल्याने प्रत्येक वाहनाच्या बदलत्या मालकांचीही सुधारित माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना नाकाबंदी करताना ही यंत्रणा अधिकच उपयुक्त ठरणार आहे.गुन्हेगारांचा शोध घेताना त्याचा मोबाइल नंबर देखील पोलिसांना महत्त्वाचा धागा ठरत असतो. मात्र अनेकदा मोबाइल कंपन्यांकडून संबंधित मोबाइलधारकाची माहिती देण्यात विलंब होत असतो. यामुळे पोलीस त्याठिकाणी पोहचेपर्यंत गुन्हेगार फरार झालेला असतो. त्यामुळे अल्पकालावधीत मोबाइल नंबरवरून संबंधिताचा संपूर्ण पत्ता कळेल अशी यंत्रणा पोलिसांनी उपयोगात आणली आहे. वाहन तलाश कंट्रोल रुममधूनच त्याचेही नियंत्रण केले जाणार आहे. या यंत्रणेद्वारे महाराष्ट्र व मुंबई डिव्हिजनमध्ये नोंद असलेल्या कोणत्याही मोबाइल नेटवर्क कंपनीच्या ग्राहकाची माहिती पोलिसांना कळणार आहे.गुन्हेगारीच्या घटना नियंत्रित करण्यासाठी गुन्हेगाराला पकडण्याची आलेली प्रत्येक संधी महत्त्वाची असते. पोलिसांपुढे आलेली अशी कोणतीही संधी न गमावता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळता याव्यात याकरिता दोन्ही अद्ययावत यंत्रणा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे वापरात असलेली चोरीची वाहने पकडण्यात नक्कीच यश येणार आहे.- शहाजी उमाप, उपायुक्त