शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खाद्यतेलांच्या आयातीमध्ये होणार वाढ

By admin | Updated: June 26, 2014 22:06 IST

यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 
अल निनोचा फटका भारताला बसत असून त्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे देशातील तेलबियांच्या उत्पादनात घट होणार आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या उत्पादनालाही बसणार आहे. देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी सरकारला खाद्यतेलाची आयात करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगितले जाते.
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया(असोचेम)ने याबाबत केलेल्या एका अभ्यासामधून हा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती सरचिटणीस डी. एस.रावत यांनी दिली. वाढत्या उत्पन्नामुळे देशातील खाद्यतेलाचा वापर सुमारे 15 टक्क्यांनी वाढत असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. देशातील खाद्यतेलाच्या एकूण मागणीपैकी सुमारे निम्मी मागणी ही आयातीमधून पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन 2क्12-13 मध्ये 11.2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खाद्यतेलाची आयात केली गेली होती. नंतरच्या वर्षात तेलबियांचे उत्पादन वाढल्याने आयातीचे प्रमाण कमी होऊन 9.3 अब्ज अमेरिकन डॉलरवर आले आहे. चालू वर्षात पुन्हा आयात वाढून 14 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4भारतातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश ही तेलबिया उत्पादक प्रमुख राज्ये आहेत.
4या राज्यांमधील पाऊस सुमारे 15 टक्क्यांनी कमी होणार असल्यामुळे तेलबियांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
 
4तेलबियांचे उत्पादन घटल्यामुळे खाद्यतेलांचे उत्पादनही कमी होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात आयात करावी लागणार आहे.
4सोयाबीन,मोहरी, शेंगदाणो, सूर्यफूल,सरसो या भारतातील प्रमुख तेलबिया आहे. याशिवाय तीळ, करडई,खुरासणी आणि एरंडी यापासूनही काही प्रमाणात तेलाची निर्मिती होते.
 
4तेलबियांना मिळणारी किंमत ही सातत्याने बदलत असते आणि ब:याचदा ती कमी असल्याने शेतकरी तेलबियांच्या उत्पादनाला फारसा उत्सुक नसल्याचे चित्र दिसून येते.