शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

योगी सरकारची दहशत, 15 दिवसांत 50 गुन्हेगार सरेंडर; घेतली अशी शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:17 IST

यातील अनेक गुन्हेगारांनी गळ्यात कार्ड लटकलेले होते. यावर, आपण आत्मसमर्पण करत आहोत, कृपया शूट करू नका, असे लिहिले होते.

योगी आदित्यनाथ सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्यातील वातावरण कमालीचे बदलले आहे. 10 मार्च रोजी आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला बंपर विजय मिळाल्यानंतर आतापर्यंत 50 गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे. एन्काउंटर होण्याच्या अथवा घरावर बुलडोझर चालण्याच्या भीतीने या गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे.

महत्वाचे म्हणजे, यातील अनेक गुन्हेगारांनी गळ्यात कार्ड लटकलेले होते. यावर, आपण आत्मसमर्पण करत आहोत, कृपया शूट करू नका, असे लिहिले होते. अनेकांनी तर स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. पुन्हा एकदा राज्यात योगी सरकार आल्याने, भयभीत झाल्यामुळे हे गुन्हेगार असे करत असल्याचे बोलले जात आहे.

एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले, या 50 गुन्हेगारांनी केवळ आत्मसमर्पणच केले नाही, तर गुन्हेगारी सोडण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. या 15 दिवसांत चकमकीत दोन गुन्हेगारांना गोळ्या लागल्या आहेत. याशिवाय 10 जणांना अटक करण्यात आली आहे. कुमार म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. गुन्हेगारांविरुद्ध झिरो टॉलरन्सचे धोरण पुढे नेण्याच्या दृष्टीने राज्याच्या प्रत्येक भागांसाठी स्वतंत्र नियोजन केले जात आहे. याच बरोबर, एकीकडे माफियांवर कडक कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे दक्षताही वाढवण्यात आली आहे. 112 गस्तही मजबूत करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

प्रशांत कुमार म्हणाले, राज्यात 2017 पासून आतापर्यंत याच धोरणामुळे एकही दंगल झालेली नाही. योगी सरकार परतल्यानंतर सर्वप्रथम गौतम सिंहने सरेंडर केले. याच्यावर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा होता. गेल्या 15 मार्चला गोंडा जिल्ह्यातील छपिया पोलीस ठाण्यात त्याने आत्मसमर्पण केले. याशिवाय सहारनपूर जिल्ह्यातील चिलकाना पोलीस ठाण्यात २३ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे. एवढेच नाही तर आता आपण गुन्हेगारी सोडत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. याचवेळी, सहारनपूरच्या देवबंदमध्ये दारूच्या तस्करीशी संबंधित 4 गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले आहे. यांनी तर शपथपत्र सादर करत, आता कोणताही गुन्हा करणार नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस