शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

...म्हणून परदेशातील अनेक भारतीय गोमांस खातात; केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त विधान  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:44 PM

खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे.

ठळक मुद्दे...तर सरकार हिंदू अजेंडा पुढे नेत आहे असा आरोप करण्यात येईलखासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे. या मुलांवर लहानपणापासून संस्कार होणं गरजेचे आहे.

बेगुसराय - नेहमी वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री आणि बिहारच्या बेगुसरायचे भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मिशनरी शाळांमध्ये शिक्षण घेऊन विदेशात जाणारे अनेक भारतीय गोमांस खातात. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी खासगी शाळांमध्ये भगवतगीता पठन शिकविलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना गिरिराज सिंह यांनी सांगितले की, खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे. त्याचसोबत शाळेत मंदिर असायला हवं. मिशनरी शाळेत शिकून विद्यार्थी अनेक मोठ्या पदांवर जातात. हीच मुले परदेशात गेल्यानंतर गोमांस खातात. त्यांना हिंदू संस्कार दिले जात नाहीत. त्यामुळे या मुलांवर लहानपणापासून संस्कार होणं गरजेचे आहे. त्यामुळे भगवत गीता श्लोक आणि हनुमान चालिसा यांना शिकविण्यात यावं असं त्यांनी सांगितले. 

भागवत कथा या कार्यक्रमाच्या उद्धाटन सोहळ्यात ते बोलत होते. सरकारी शाळांमध्ये जर गीता श्लोक आणि हनुमान चालिसा शिकविण्यास सुरुवात केली तर अनेकांकडून सरकारवर टीका होईल. सरकार हिंदू अजेंडा पुढे नेत आहे असा आरोप करण्यात येईल त्यामुळे याची सुरुवात खासगी शाळांमधून करण्यात यावी असं गिरिराज सिंह यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह नेहमी वादग्रस्त विधान करण्यासाठी ओळखले जातात. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करताना जर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला नाही तर देशात सामाजिक समतोल बिघडेल. तसेच देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या कमी होत आहे असं त्यांनी सांगितले होते. यावेळी गिरिराज सिंह यांनी सांगितले होते की, १९४७ मध्ये ३३ कोटी लोकसंख्या होती. आज १२५ कोटी देशाची अधिकृत लोकसंख्या आहे. मात्र हा आकडा १३६ कोटींच्या वर गेला आहे. देशातील ५४ जिल्ह्यात हिंदूंच्या संख्येत घट होत आहे असं विधान त्यांनी केलं होतं. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विधानावरुन अनेकदा विरोधी पक्षांकडून भाजपाला टार्गेट करण्यात आलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाHinduहिंदूbeefगोमांस