शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

Coronavirus: केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय; कोविड उपचार घेण्यासाठी रिपोर्ट पॉझिटिव्ह येणं बंधनकारक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 4:45 PM

आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना ३ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन आणि परिपत्रक काढण्याची सूचना दिली आहे.

ठळक मुद्देकोणाकडेही ओळखपत्र नसल्या कारणाने त्याला उपचारासाठी दाखल होण्यापासून नकार दिला जाऊ शकत नाही.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संशयित कोरोना संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचाराला सुरूवात होणार आहे.केंद्र सरकारने खासगी रुग्णालयासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत

नवी दिल्ली – कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना कोविड फॅसिलिटीत दाखल करण्यासाठीच्या राष्ट्रीय धोरणात बदल केला आहे. आता कोविड आरोग्य सुविधेसाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे बंधनकारक नाही. रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन सरकारने हे पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संशयित कोरोना संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचाराला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत कोविड सुविधेत दाखल होण्यासाठी केवळ कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे आवश्यक होतं. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत. या आदेशात म्हटलंय की, ज्या रुग्णांना कोविडचा संशय वाटतो अशांना CCC, DCHC या संशयित वार्डात दाखल करून घ्यावं. कोणत्याही रुग्णांना सेवा देण्यपासून रोखलं जाऊ शकत नाही असं केंद्राने सांगितले.

या सेवांमध्ये ऑक्सिजन अथवा आवश्यक औषधांचाही समावेश आहे. मग भलेही रुग्ण दुसऱ्या शहरातील का असू नये. कोणाकडेही ओळखपत्र नसल्या कारणाने त्याला उपचारासाठी दाखल होण्यापासून नकार दिला जाऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याला भरती केलं जाऊ शकतं. मात्र ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज नाही, विनाकारण बेड अडवून राहिलेत याची खातरजमा करून घ्यावी. याशिवाय रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत संबंधित पॉलिसीनुसार सोडावं. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना ३ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन आणि परिपत्रक काढण्याची सूचना दिली आहे.

गेल्या २४ तासांत १८ लाखांहून अधिक चाचण्या

ग्रूप ऑफ मिनिस्टर्सच्या (GoM) २५ व्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन संबोधित करत होते. "देशात सलग तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४,०१,०७८ नवे रुग्ण आढळले आहेत. पण दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की गेल्या २४ तासांत ३ लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी देखील पोहोचले आहेत. आता देशाची एका दिवसाची चाचण्यांची क्षमता २५ लाख इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १८ लाख ८ हजार ३४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत", असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशात गेल्या २४ तासांत ४ हजार १८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा एकूण मृत्यूंचा आकडा २ लाख ३८ हजार २७० वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ इतकी झाली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार