शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेचा खरा विकास साहित्यातून होत असतो

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

* चंद्रकुमार नलगे : कुद्रेमनी येथे ११ वे साहित्य संमेलन

* चंद्रकुमार नलगे : कुद्रेमनी येथे ११ वे साहित्य संमेलन
* कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील साहित्य संमेलनात बोलताना प्रा. चंद्रकुमार नलगे.
क्रमांक : २२०१२०१७-गड-०८
चंदगड : प्रलंबित असलेला सीमाप्रश्न महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने सामंजस्याने विचार करून सोडवायला हवे. सीमेवरच्या लढाईत मराठी माणसांनाच अत्याचार सहन करावा लागला आहे. ९ व्या शतकापासून संपूर्ण कर्नाटकात मराठीचा जागर घुमतोय. त्यामुळे संकुचितवृत्तीने मराठी भाषेला विरोध करणे चुकीचे आहे. लोकजागर, प्रबोधन, समाज बदलण्यासाठी साहित्य संमेलन व्हावीत. नवसमाज निर्मिती व मानवता जिवंत ठेवायची असेल तर साहित्याचा विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रा. चंद्रकमार नलगे यांनी केले.
कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथे बलभीम साहित्य संघ आयोजित ११ व्या साहित्य संमेलनात बोलत होते.
प्रास्ताविक महादेव गुरव यांनी करून साहित्य चळवळीतूनच मराठीचा जागर करणे व मराठी भाषिकांमध्ये एकजूट ठेवणे हाच या संमेलनाचा उद्देश आहे.
नलगे म्हणाले, त्यागावर आधारलेली भारतीय संस्कृती आहे. पण, स्वैराचार वाढलेल्या युगात सृजनशील संस्कृतीलाच धोका निर्माण झाला आहे. माता व मातीचे ऋण मोठं आहे. ते जपण्याचे काम आजच्या साहित्यकांनी केले पाहिजे, असे सांगून मराठी मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी कर्नाटक सरकारने मोठं मन दाखवायला हवं.
संमेलनाच्या उद्घाटक जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी साहित्य संमेलने ही सीमाभागातील चळवळ बनली पाहिजे, असे मत व्यक्त करून सीमाभागातील मराठी भाषा आणि भाषिक यांना या साहित्य संमेलनातून बळ मिळत असल्याचे सांगितले.
प्रारंभी सकाळी गावातून गं्रथदिंडी काढण्यात आली. दुसर्‍या सत्रात प्रा. राजू पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात लता ऐहोळे, अनिल दीक्षित, पूजा भंडांगे यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर मराठी संत साहित्यातील सामाजिक विचार या विषयावर प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे व्याख्यान झाले. तिसर्‍या सत्रात मारुती कंगोरे यांनी कथाकथन सादर केले.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, एन. बी. खांडेकर, माधुरी हेगडे, अशिता सुतार, आर. के. सुतार, शामला मारुती पाटील, अर्जून जांबोटकर, रघुनाथ गुडेकर, दीपक दळवी, डॉ. विजय क˜ीमणी, डॉ. व्ही. एस. सातेरी, प्रा. एम. बी. मापटे, प्रा. राजेश घोरपडे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, रामचंद्र पाटील, पी. डी. कांबळे, महंेद्र पाटील आदीसह चंदगड, खानापूर, बेळगावमधील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. वंदना गुरव यांनी स्वागत केले. जी. जी. पाटील व शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. अमित मोहिते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चौकट
* १९८१ मध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा स्थापन करण्याला तत्कालीन प्रस्तावित साहित्यकराकडून प्रचंड विरोध झाला. यावेळी तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी मदत केल्यामुळे ग्रामीण भागात साहित्य संमेलने होऊ लागल्याचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी सांगितले.
* १९८२ मध्ये बेळगाव येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संस्थेतर्फे बेळगाव येथील साहित्य संमेलनाला परवानगी नाकारली होती. भाई दाजिबा देसाई यांच्यामुळेच ते संमेलन ज्योती कॉलेजमध्ये होऊ शकले, याची आठवणही नलगेंनी यावेळी करून दिली.