शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
4
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
5
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
6
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
7
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
8
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
9
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
10
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
11
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
12
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
13
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
16
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
17
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
19
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
20
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
Daily Top 2Weekly Top 5

कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 05:33 IST

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली : बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात मृताच्या वारसांना भरपाई देण्यास विमा कंपन्या बांधील नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता. अत्यंत वेगात असलेली ही कार नियंत्रण सुटल्यामुळे उलटली होती. यात रवीशचा मृत्यू झाला होता. याच कारमध्ये त्याचे वडील, बहीण व मुलेही होती.

उच्च न्यायालय म्हणाले होते, दावा करता येणार नाही

हा अपघात बेजबाबदारपणे कार चालवल्याने झाला. चालकाने वाहतूक नियमांचेही पालन केले नाही. या अपघातास चालकच जबाबदार होता. त्यामुळे त्याचे उत्तराधिकारी कोणत्याही भरपाईचा दावा करू शकत नाहीत. असा दावा मंजूर केला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या चुकीच्या कार्यासाठीही भरपाई मिळू शकते, असा संदेश जाईल.

फेटाळला होता दावा

या अपघातानंतर विमा कंपनीने रवीश यांच्या कुटुंबीयांनी केलेला अपघात विम्याच्या भरपाईचा ८० लाख रुपयांचा दावा कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला होता. न्यायालयाने हा निकाल देताना बेजबाबदारपणे कार चालवल्याने अपघात झाल्याचे निरीक्षण पुराव्याआधारे नोंदवले होते. या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला.