शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

... तर अख्खा देश अंधारात बुडेल; हेमंत सोरेन यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:07 IST

झारखंड मुक्ती मोर्चाच्या ५३ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत त्यांनी हा इशारा दिला आहे. 

केंद्र सरकारने झारखंडच्या वाट्याचे १.३६ लाख कोटी रुपये दिले नाहीत तर अख्खा देश अंधारात जाईल, अशी निर्वाणीचा इशारा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या ५३ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत त्यांनी हा इशारा दिला आहे. 

राज्याचा पैसा मिळण्यासाठी सध्या पत्रव्यवहार सुरु आहे. संदेशही पाठविलेला आहे. आमच्या हक्काचा पैसा दिला नाही तर केंद्र सरकारविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. याचबरोबर कोळसा खाणी देखील बंद करू. यामुळे संपूर्ण देश अंधारात बुडेल. केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक आता झारखंड सहन करणार नाही, असा इशाराच सोरेन यांनी दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी कोळसा मंत्री झारखंडमध्ये आले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. झारखंडमध्ये जमिनीचा दर जास्त आहे, तो कमी केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. यावर मी त्यांना खडसावले, जमीन आमची आहे तर आम्हाला जेवढा दर वाटेल तेवढाच राहिल. कोळसा कंपन्यांनी ज्या खाणींमधून उत्खनन बंद केले आहे त्या जमिनी मालकांना परत द्याव्यात, अशीही मागणी केल्याचे सोरेन म्हणाले. 

या जमिनी परत दिल्या नाहीत तर आम्ही त्या जमिनींवर कब्जा करू, केंद्राने अर्थसंकल्पात झारखंडला काही दिलेले नाही. मनरेगाची रक्कम कमी केली आहे. ५० लाख कोटींच्या बजेटमध्ये केंद्राला १२ लाख कोटी रुपये व्याजासह परत करावे लागणार आहेत, अशी टीकाही सोरेन यांनी केली. 

कोळसा क्षेत्रात उत्खनन करणाऱ्या आउटसोर्सिंग कंपन्या कोळशाची लूट करत आहेत. स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. इतर राज्यातील लोक काम करत आहेत आणि स्वतःला झारखंडचे मालक मानत आहेत, अशी टीका मंत्री हाफिजुल हसन यांनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडNarendra Modiनरेंद्र मोदीelectricityवीज