शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 08:15 IST

या व्हर्च्युअल बैठकीत २४ पक्षांनी भाग घेतला होता. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी दिल्ली : संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी व्हर्च्युअल बैठक घेत सरकारला घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजप सरकारला संसदेमध्ये आठ वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून जाब मागितला जाणार आहे. 

तिवारी म्हणाले की, या व्हर्च्युअल बैठकीत २४ पक्षांनी भाग घेतला होता. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. इंडिया आघाडीचे नेते लवकरच एकमेकांना प्रत्यक्ष भेटणार आहेत. यात सरकारच्या धोरणाविरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याच्या मुद्द्यावर चर्चा होईल. ऑनलाइन बैठकीत विविध अनेक नेत्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले, परंतु प्रामुख्याने आठ मुद्द्यांवर सर्वांचे एकमत झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना-उबाठाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, राजद नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, ‘आप’ने बैठकीपासून दूर राहिली. संसद व्यवस्थित चालावी, असे इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना वाटते, परंतु यासाठी सरकारला विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उपस्थित राहून स्वतः या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. देशात लोकशाही आणि संवैधानिक अधिकार धोक्यात आहेत आणि अशा परिस्थितीत विरोधी पक्षांची भूमिका व जबाबदारी आणखी महत्त्वाची बनते, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. 

परराष्ट्र धोरणाबद्दल विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता सरकारच्या परराष्ट्र धोरणाबद्दल विरोधी पक्षांनी विशेष चिंता व्यक्त केली. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे दावे, बिहारमधील एसआयआर सराव, मतदानाच्या अधिकारांवरील संकट, सीमांकन, एससी, एसटी आणि महिलांवरील अत्याचार, अहमदाबादमधील विमान अपघात, ‘अघोषित आणीबाणी’, सरकारचे परराष्ट्र धोरण आदी मुद्द्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी आधीच पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थी भाष्य आणि चीन मुद्द्यांवर किमान दोन दिवस चर्चेची मागणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Indiaभारतcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस