शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 04:15 IST

केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.

- धनाजी कांबळे

तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा मुद्दा भावनिक होता. टीडीपी काँग्रेससोबत गेल्याने येथील जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांची मते वळविण्यात केसीआर यशस्वी ठरले आहेत. विरोधकांनी पातळी सोडून टीका-टिप्पणी केल्याने त्याचा काँग्रेस आघाडीला नुकसानच झाल्याचे दिसत आहे.

शेतकरी कर्जमाफी, दलित-आदिवासींना ३ एकर जमीन, रोजगार, मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, दोन खोल्यांची घरे, पेन्शन असे प्रश्न प्रामुख्याने विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले; केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.

भाजपाने मात्र हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करून मुस्लिमांचे लाड करून घेतले जाणार नाहीत, तसेच १२ टक्के आरक्षण देणे शक्यच नाही, कोणी देण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊ देणार नाही, अशा पद्धतीने अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी भडकावू भाषणे केली.

नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक आवाहन केले; मात्र तेलंगणात केवळ २ जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागले आहे. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सोनिया गांधी प्रथमच येथे आल्या होत्या. त्यांच्या सभेचा परिणाम होईल, असे वाटले होते. मात्र, स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक झाल्याने काँग्रेसला देखील टीडीपीला सोबत घेऊनही मतदारांनी नाकारले आहे. टीडीपीचा तेलंगणातील वाढता हस्तक्षेप धोकादायक असून, आंध्रातील लोक आमच्यावर राज्य करतील, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहन केसीआर यांनी सभांमधून केले आहे. त्यामुळे अस्मितेचा मुद्दाही येथे महत्त्वाचा ठरला आहे.

एमआयएमने ८ जागा लढविल्या. त्यात त्यांना आता ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सुरुवातीलाच टीआरएसला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे हैैदराबादमधील एमआयएमचे उमेदवार विजयी होतील, असेच अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त झाले होते.

या कारणांमुळे झाला टीआरएसचा विजय
तेलंगणाच्या जनतेवर आंध्रातील लोक राज्य करतील, हा भावनिक मुद्दा
चित्र बदलण्यास कारणीभूत ठरला.
काँग्रेसने टीडीपीला सोबत घेतल्याने काँग्रेसबद्दलची सहानुभूती कमी होऊन टीआरएसकडे कल वाढला.
विकासकामे आणि राबविलेल्या योजनांमुळे लोकमत आपल्या बाजूला वळविण्यात केसीआर यांना यश आले. विरोधकांमधील बेकीमुळेही टीआरएसला मदत झाली.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेस