शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

“जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:07 IST

मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणुकीत जिंकलेल्या सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंद अधिकाऱ्यांना पचलेला दिसत नाही. कारण, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजप पराभूत झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला होता. आता मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. (suvendu adhikari warns midnapore sp says do not do anything to risk of transfer to jammu kashmir)

ममता बॅनर्जी सरकार भाजप कार्यकर्त्यांना खोट्या आरोपांखाली फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुवेंदू अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीवर नाराजी व्यक्त करत मिदनापूरच्या पोलीस अधिक्षकांना धमकवल्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला तुमची बदल जम्मू काश्मीरमधील अनंतनाग किंवा बारामुल्ला भागात व्हावी, असे वाटत नसेल, तर काहीही करू नका, अन्यथा धडा शिकवला जाईल, असा इशारा अधिकारी यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याचे सर्व कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. यात याच पोलीस स्थानकातून फोन केल्याचे दिसत आहे. तुम्हाला राज्य सरकारचा पाठिंबा असेल, तर माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे. भाजप कमकुवत आहे, असे समजू नका, या शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने ताडपत्री आणि मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे. याचीच चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

दरम्यान, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच भाजपचा पराभव झाला. आपले लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून, यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे सांगत अधिकारी यांनी स्वपक्षावर निशाणा साधला.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी