शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

“जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:07 IST

मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणुकीत जिंकलेल्या सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंद अधिकाऱ्यांना पचलेला दिसत नाही. कारण, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजप पराभूत झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला होता. आता मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. (suvendu adhikari warns midnapore sp says do not do anything to risk of transfer to jammu kashmir)

ममता बॅनर्जी सरकार भाजप कार्यकर्त्यांना खोट्या आरोपांखाली फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुवेंदू अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीवर नाराजी व्यक्त करत मिदनापूरच्या पोलीस अधिक्षकांना धमकवल्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला तुमची बदल जम्मू काश्मीरमधील अनंतनाग किंवा बारामुल्ला भागात व्हावी, असे वाटत नसेल, तर काहीही करू नका, अन्यथा धडा शिकवला जाईल, असा इशारा अधिकारी यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याचे सर्व कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. यात याच पोलीस स्थानकातून फोन केल्याचे दिसत आहे. तुम्हाला राज्य सरकारचा पाठिंबा असेल, तर माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे. भाजप कमकुवत आहे, असे समजू नका, या शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने ताडपत्री आणि मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे. याचीच चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

दरम्यान, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच भाजपचा पराभव झाला. आपले लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून, यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे सांगत अधिकारी यांनी स्वपक्षावर निशाणा साधला.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी