शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

"आता मागे फिरता येणार नाही"; तडजोड करुन पलटी मारणाऱ्या पत्नीला दणका, २३ वर्षांचे लग्न एका आदेशात मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:10 IST

घटस्फोट प्रकरणात म्युच्युअल सेटलमेंटनंतर शब्दावरून फिरणाऱ्या पक्षाला सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले.

Supreme Court: पती-पत्नीमधील वादात एकदा मध्यस्थीने अंतिम तडजोड झाली आणि त्यावर दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱ्या झाल्या, तर त्यानंतर कोणताही पक्ष आपल्या शब्दावरून मागे फिरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेत तुमची संमती मागे घेण्याचा अधिकार तुम्हाला नक्कीच आहे, पण एकदा तडजोड ठरल्यानंतर त्यात दिलेल्या आश्वासनांपासून किंवा जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्यासाठी तुम्ही या अधिकाराचा गैरवापर करू शकत नाही," असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण २००० साली विवाह झालेल्या एका जोडप्याचे आहे. २३ वर्षांच्या संसारानंतर २०२३ मध्ये त्यांच्यात वाद निर्माण झाले. पतीने क्रूरता आणि व्यभिचाराच्या आरोपावरून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण मध्यस्थी केंद्रात गेले, जिथे दोघांनी सर्व वाद मिटवून परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

तडजोडीनुसार, पतीने पत्नीला १.५ कोटी रुपये, गाडीसाठी १४ लाख रुपये आणि दागिने देण्याचे मान्य केले होते. यातील ७५ लाख आणि गाडीचे पैसे पतीने दिलेही होते. मात्र, अंतिम टप्प्यात पत्नीने आपली संमती मागे घेतली आणि पतीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.

१७० कोटींचा अजब दावा आणि कोर्टाची नाराजी

या प्रकरणात नंतर पत्नीने कोर्टात एक धक्कादायक दावा केला. तडजोडीत ठरलेल्या रकमेव्यतिरिक्त पतीने आपल्याला १२० कोटींचे दागिने आणि ५० कोटींची सोन्याची बिस्किटे देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते, असा युक्तिवाद तिने केला. टॅक्स वाचवण्यासाठी हे लेखी स्वरूपात घेतले नव्हते, असंही यावर सांगितले. यावर न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला. "अशा प्रकारचे दावे करणे म्हणजे न्यायव्यवस्थेचा अनादर आहे," असे म्हणत कोर्टाने फटकारले.

सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

एकदा मध्यस्थीने तडजोड केली की, त्यातून माघार घेणाऱ्या पक्षावर मोठा दंड आकारला पाहिजे. अशा वर्तनामुळे मध्यस्थी प्रक्रियेच्या मूळ हेतूलाच धक्का बसतो. फक्त फसवणूक, दबाव किंवा दुसऱ्या पक्षाने अटी पूर्ण न केल्यास तडजोड रद्द होऊ शकते. इथे निव्वळ मनमानी चालणार नाही, अशा शब्दात कोर्टाने सुनावले. लग्नाच्या २३ वर्षांनंतर आणि तडजोड फिस्कटल्यावर दाखल केलेला घरगुती हिंसाचाराचा खटला हा केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने असल्याचे मानून कोर्टाने तो रद्द केला.

या जोडप्याचे नाते आता सुधारण्याच्या पलीकडे गेले आहे असे निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर केला आणि त्यांचा विवाह रद्द ठरवला. तसेच, पतीने तडजोडीतील उरलेली रक्कम पत्नीला द्यावी, असे आदेश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : No U-Turn After Settlement: Supreme Court Annuls 23-Year Marriage

Web Summary : Supreme Court ruled against a wife retracting from a settlement. The couple's 23-year marriage ended after she backtracked on an agreement, demanding more money. The court criticized her actions, dissolved the marriage, and ordered the husband to pay the remaining settlement amount.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDivorceघटस्फोटmarriageलग्न