शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च

By सायली शिर्के | Updated: September 24, 2020 09:55 IST

झारखंडमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये टॉपर्स असलेल्या दोन विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून कार देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नेहमीच सत्कार केला जातो. शाळा, विविध राजकीय पक्ष, खासगी क्लासेस यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येतं. झारखंडच्याशिक्षणमंत्र्यांनी मात्र टॉपर्सना मोठं गिफ्ट दिलं आहे. झारखंडमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये टॉपर्स असलेल्या दोन विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून कार देण्यात आली आहे. झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना कार भेट देण्यात आली. 

विशेष म्हणजे कारसोबतच  शिक्षणमंत्री जगरनाथ महतो या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचा देखील खर्च करणार आहेत. मनीष कुमार कटियार आणि अमित कुमार अशी टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. निकाल जाहीर झाला त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्सना बक्षिस म्हणून कार देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला आणि कारच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. जगरनाथ महतो यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबतची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्सना दिली चक्क 'कार' गिफ्ट

"झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक बिनोद बिहारी महतो यांच्या जयंतीनिमित्त दहावीचा टॉपर मनीष कुमार कटियार आणि बारावीचा टॉपर अमीत कुमार अल्टो कार गिफ्ट म्हणून देण्यात आल्या" अशी माहिती जगरनाथ महतो यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कारच्या चाव्या देतानाचे काही फोटोही ट्विट केले आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीने बक्षिस देण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल आणि ते परीक्षेत यश संपादन करतील असंही महतो म्हणाले आहेत. 

"टॉपर्सचा सन्मान केल्याने विद्यार्थ्यांना आणखी मेहनत करण्याची मिळते प्रेरणा"

बारावीचा टॉपर असलेल्या अमीत कुमाने जेईई मेन्समध्येही चांगले गुण संपादन केले आहेत. अशा पद्धतीने टॉपरचा सन्मान केल्याने विद्यार्थ्यांना देखील आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं अमितने सांगितलं आहे. दहावीचा टॉपर मनीष कुमार कटियार दरलाघाटचा रहिवासी आहे. त्याने परिक्षेमध्ये  500 पैकी 490 गुण मिळवले आहेत. अभ्यास करून उत्तम यश मिळवलं असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या पालकांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"

माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

टॅग्स :Educationशिक्षणJharkhandझारखंडStudentविद्यार्थीexamपरीक्षाcarकार