शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अमित शहांच्या भाषणात विरोधकांचे अडथळे; टीव्हीने प्रक्षेपण काही काळ थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 06:28 IST

आसाममधील लोकांच्या हक्कांचे केंद्र सरकार रक्षण करील, असे शहा यांनी सांगताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडत असताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ माजविल्याने सभागृहाच्या कामकाजाचे राज्यसभा टीव्हीवरून होणारे थेट प्रक्षेपण राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या आदेशाने काही काळ थांबविण्यात आले.

आसाममधील लोकांच्या हक्कांचे केंद्र सरकार रक्षण करील, असे शहा यांनी सांगताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणण्यास सुरुवात केली. असे करू नका असे व्यंकय्या नायडू यांनी बजावूनही विरोधी पक्षांचे सदस्य ऐकत नव्हते. अडथळे आणणाऱ्या खासदारांनी व्यक्त केलेली मते पटलावर न घेण्याचे आदेशही नायडू यांनी दिले.

सभापतींनी आपल्या आसनाजवळचे लाल बटण दाबताच राज्यसभा टीव्हीने सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण काही काळ बंद केले. त्यानंतर विरोधक शांत झाले. कामकाज सुरळीत पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याचे राज्यसभा टीव्हीने पुन्हा थेट प्रक्षेपण सुरू केले.या विधेयकामुळे भारतातील मुस्लिमांनी घाबरण्याचे कारण नाही. ते भारताचे नागरिक आहेत व राहतील, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारतीय मुस्लिमांचा कोणीही छळ करणार नाही.

देशभक्तीच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही : संजय राऊत

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभक्तीचे प्रमाणपत्र कुणाकडूनही घेण्याची आम्हाला गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजपवर हल्ला चढविला. ते म्हणाले, विधेयकावरून देशातील अनेक भागांमध्ये आंदोलन सुरू झाले आहे.च्या विधेयकाला विरोध करणारे देशद्रोही असल्याचे चित्र सत्तारूढ पक्षातर्फे रंगविले जात आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्र कुणाकडून घेण्याची गरज नाही. हिंदुत्वाच्या ज्या शाळेत तुम्ही शिकत आहात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर राहिलो आहोत. बाळासाहेब ठाकरे या शाळेचे हेडमास्तर होते.

काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये दोन मुस्लिम जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांनीही विधेयकाला विरोध केला आहे. काही महिन्यांपूर्वी ३७० कलम रद्द करण्यात आले. या कलमाने काश्मिरी पंडित जम्मूत परत जातील, असे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात काय झाले? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Amit Shahअमित शहाRajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक