शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Pulwama Aattack: 'ज्या हल्ल्यातून आपली असमर्थतता दिसली; त्याचं स्मारक कशासाठी?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 1:14 PM

माकप नेते मोहम्मद सलिम यांच्या विधानानं वाद

नवी दिल्ली: पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलिम यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ४० जवानांचं स्मारक उभारण्याची गरज नाही. त्यामुळे केवळ आपल्या असमर्थतेची आठवण होईल. कारण आपण तो हल्ला रोखण्यात अपयशी ठरलो होतो, असं वक्तव्य सलिम यांनी केलं आहे. पुलवाम्यात गेल्या १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. 'आपली असमर्थतता दाखवणारं स्मारक उभारण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ८० किलो आरडीएक्स भारतात कसं आणलं गेलं? जगातल्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत सर्वाधिक जवान तैनात असलेल्या भागात आरडीएक्सचा स्फोट कसा काय झाला?, या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत,' असं सलीम यांनी म्हटलं आहे.पुलवामात वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या मित्र परिवाराबद्दल मला पूर्ण सहानुभूती असल्याचं सलिम म्हणाले. पुलवामातला हल्ला रोखण्यात आपण अपयशी ठरलो. त्याबद्दल प्रश्न विचारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी न्यूज१८ला सांगितलं. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत, यासाठी प्रश्न विचारायला हवेत, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही आपल्या जवानांचं रक्षण करू शकलो नाही. वरिष्ठांना त्यांची चिंता नाही. सीमेपलीकडून आरडीएक्स आलं. याची केंद्र सरकारनं चौकशी करायला हवी होती,' असं सलिम यांनी म्हटलं. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या-पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवालPulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं!आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला