शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देशात पुन्हा 'आणीबाणी'ची शक्यता - लालकृष्ण आडवाणी

By admin | Updated: June 18, 2015 11:56 IST

भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी)४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होणार नाही हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणी यांनी गुरुवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. देशात इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीला यावर्षी ४० वर्ष होत असून यानिमित्त लालकृष्ण आडवाणींनी देशातील सद्य राजकीय स्थितीवर परखड मतं मांडली आहेत. १९७५ - ७७ या आणीबाणीच्या काळानंतरही देशात पुन्हा नागरिकांच्या स्वातंत्र्यांवर गदा येणार नाही असे नाही. या गोष्टी सहजपणे करणे शक्य नसले तरी अशा गोष्टी घडूच शकणार नाही असे नाही. नागरिकांचे मुलभूत हक्क पुन्हा हिरावून घेतले जाऊ शकतात असे आडवाणींनी म्हटले आहे. 
पुन्हा आणीबाणी येईल असे का वाटते असा प्रश्न विचारला असता आडवाणी म्हणाले, आपल्या राजकीय व्यवस्थेत असे कोणतेही संकेत दिसत नाही की आपण निर्धास्त राहू, राजकीय नेतृत्वापासूनही कोणतेही चांगले संकेत मिळत नाही, सध्याचे राजकीय नेतृत्व परिपक्व नाही असा याचा अर्थ नाही, पण विद्यमान नेतृत्वांवर विश्वास ठेवता येत नाही असेही त्यांनी नमूद केले. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे.