शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:10 IST

PM Narendra Modi In Gandhinagar: त्याच दिवशी दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही आणि त्याचे परिणाम आपण गेली ७५ वर्षे भोगत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

PM Narendra Modi In Gandhinagar: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीधाम येथे एका सभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. तत्पूर्वी मोठा रोड शो करण्यात आला. 

सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९४७ वेळी भारताची फाळणी झाली. तेव्हा घडलेल्या काही गोष्टींचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा १९४७ रोजी देशाची फाळणी झाली, तेव्हा काही साखळदंडातून मुक्तता व्हायला हवी होती. परंतु, हातातील बळ संपुष्टात आणण्यात आले. देशाचे तीन तुकडे करण्यात आले. त्याच रात्री पहिला दहशतवादी हल्ला काश्मीर खोऱ्यात करण्यात आला. देशाचा एक भाग दहशतवादाच्या बळावर पाकिस्तानने हडपला. त्याच दिवशी या दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. सरदार पटेल यांची तेव्हा अशीच इच्छा होती की, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येत नाही, तोपर्यंत सैन्याने थांबता कामा नये. मागे हटता कामा नये. परंतु, सरदार पटेल यांचे ऐकले नाही. याच दहशतवाद्यांना भारताला रक्तबंबाळ करण्याचे काम पुढे ७५ वर्ष सुरू ठेवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

७५ वर्ष आपण केवळ सहन करत आहोत

पहलगाम येथे झालेला हल्लाही याच विकृतीचा भाग होता. गेली ७५ वर्ष आपण केवळ सहन करत आहोत. जेव्हा जेव्हा पाकिस्तानशी युद्ध करायची वेळ आली, तेव्हा तेव्हा तीनही वेळा भारताच्या सैन्याने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. ०६ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबण्यात आले. पण आता ‘ऑपरेशन सिंदूर’ जनबळावर पुढे नेण्यात येईल. जनतेने आता देशाच्या विकासात सहभागी व्हायला हवे. आपली जबाबदारी घ्यावी. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचे आहे. भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे, त्यासाठी जनतेने हातभार लावावा. परदेशी वस्तू वापरणार नाही, असा संकल्प घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी देशाला केले. 

दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेरासमोरच केल्या. अवघ्या २२ मिनिटांत दहशतवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त करण्यात आली. नंतर कुणी पुरावे नाहीत, अशी बोंब करू नये, म्हणून यावेळी आधीच कॅमेऱ्यांची पूर्ण व्यवस्था केली होती. ६ मेची ती दृश्य बघितल्यावर कुणीही याला प्रॉक्सी वॉर म्हणू शकत नाही. यावेळी आम्हाला पुरावे द्यावे लागले नाहीत, त्यांनी समोरूनच परिस्थिती दाखवली, असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना सुनावले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक