शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या युद्धास पाकचे अभय

By admin | Updated: January 14, 2015 02:09 IST

दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे

नवी दिल्ली : दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे. सीमेवर सतत सुरू असलेला गोळीबार आणि घुसखोरीच्या घटनांबाबत त्यांनी धोक्याचा इशारा दिला़मंगळवारी वार्षिक पत्रपरिषदेत बोलताना, त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले़ गत महिन्यात पाकच्या पेशावरमधील एका लष्करी शाळेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता़ या हल्ल्याचा उल्लेख करीत लष्करप्रमुख म्हणाले की, या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे मन बदलले की नाही, याची प्रतीक्षा करावी लागेल़ स्वत:च्या नागरिकांचे जीव जात असूनही छुप्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तान अभय देत आहे़सीमेपलीकडून सुरू असलेल्या सततच्या गोळीबाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, सीमेवरील कडक पहाऱ्यामुळे अतिरेक्यांना भारतात घुसखोरी करणे अशक्य झाले आहे़ नियंत्रण रेषेऐवजी आता आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचा भंग सुरू आहे़ नियंत्रण रेषेवरील आपला कडक पहारा आणि घुसखोरीविरोधी व्यूहरचनेमुळे कदाचित यामुळे घुसखोरांनी आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवला असावा़ आंतरराष्ट्रीय सीमेवरील खुली गटारे आणि नाल्यामुळे घुसखोरांना मदत मिळते़ मात्र भारतीय लष्कर घुसखोरीची समस्या निपटण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे़ भारतीय सुरक्षा दलाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, जम्मू काश्मिरात सन २०१४ दरम्यान सुरक्षा दलाने राज्यात सर्वाधिक संख्येत अतिरेक्यांना निष्क्रिय केले़ ११० अतिरेक्यांपैकी १०४ अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ गतवर्षी ६५ अतिरेकी ठार झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)