शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वामुळेच देशात एकता निर्माण होईल - मोहन भागवत

By admin | Updated: January 19, 2015 10:55 IST

हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे.

ऑनलाइन लोकमत
सागर, दि. १९ - ' हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल' असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे. मध्य प्रदेशमधील सागर येथे संघाच्या शिबिरादरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केले.
'आपल्या देशात विविधता दिसून येते. मात्र अनेक पंथ, प्रांत आणि भाषांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य फक्त हिंदुत्वामुळेच साकार होऊ शकते. हिंदुत्व सर्वांचा स्वीकार करते', असे भागवत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी इस्रायलपासून धडा घेण्याचा सल्लाही दिला. 'आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हाच आणखी एक राष्ट्र अस्तित्वात आले होते, ते म्हणजे इस्रायल. त्या देशाच्या स्वातंत्र्याची जेव्हा घोषणा होत होती, तेव्हाच आजूबाजूच्या आठ देशांनी त्याच्यावर हल्ला केला. आत्तापर्यंत इस्रायलने पाच युद्ध लढली आहेत. एकेकाळी वाळवंट आणि ओसाड भूमी असलेला हा देश आज नंदनवन बनला आहे असे सांगत त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.
इस्रायलमधील नागरिकांकडे वाकड्या नजरेने पहायचे साहस कोणीही करत नाही अशा शब्दांत त्यांनी त्यांची स्तुती केली. आणि जे असं करतात त्यांना त्याचे शासन मिळते, हेच त्यांचे सामर्थ्य आहे, असे भागवत म्हणाले. जेव्हा देश सशक्त असतो तेव्हा घर-दार सर्व सुरळीत असते आणि जेव्हा देशाला धोका असतो तेव्हा जीवन सुरक्षित नसते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना संघात येण्याचे, तिकीटाची लालसा न बाळगता सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.