शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 23:31 IST

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्या राजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत.

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्याराजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत. एकीकडे बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूच्या संबंधांबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मोदींच्या जन्मदिनानिमित्त नितीश कुमार यांनी व्हाईट बोर्डवर आपल्या हातांनी शुभेच्छा लिहिल्या. नितीश कुमार यांनी आधी ट्विट करून मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी खास व्हाईट बोर्डवरून शुभेच्छा दिल्याने त्यातून त्यांनी सुचक संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. (Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions)

गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि जेडीयूमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच नितीश कुमार पुन्हा एकदा मोदीविरोधी गटाशी हातमिळवणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नितिश कुमार यांनी या शुभेच्छा दिल्याने या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. 

२०१७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार असताना नितीश कुमार यांनी पाटणामधील एका कार्यक्रमात एका व्हाईट पेंटिंगमध्ये रंगकाम केले होते. त्यामधील कमळ त्यांनी रंगवले होते. त्यानंतर बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. तसेच नितीश कुमार यांनी भाजपासोबत पुन्हा हातमिळवणी करत राज्यात एनडीएचे सरकार स्थापन केले होते. दरम्यान, आजच्या संदेशामधून नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपासोबत चांगले संबंध कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची सुरुवात काही दिवसांआधीच केली होती. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जेडीयू सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हरियाणामध्ये चौधरी देविलाल यांच्या जयंतीला निमंत्रण असूनही उपस्थित राहणे टाळले होते.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या या शुभेच्छा संदेशावर राजदने खोचक टीका केली आहे. नितीश कुमार हे गुजरातमधील परिस्थिती पाहून घाबरले आहेत. तिथे भाजपाने सर्व सरकारच बदलले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपाशी आणि मोदींशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे, असा टोला राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारPoliticsराजकारण