शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:29 PM

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्या राजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत.

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्याराजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत. एकीकडे बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूच्या संबंधांबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मोदींच्या जन्मदिनानिमित्त नितीश कुमार यांनी व्हाईट बोर्डवर आपल्या हातांनी शुभेच्छा लिहिल्या. नितीश कुमार यांनी आधी ट्विट करून मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी खास व्हाईट बोर्डवरून शुभेच्छा दिल्याने त्यातून त्यांनी सुचक संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. (Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions)

गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि जेडीयूमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच नितीश कुमार पुन्हा एकदा मोदीविरोधी गटाशी हातमिळवणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नितिश कुमार यांनी या शुभेच्छा दिल्याने या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. 

२०१७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार असताना नितीश कुमार यांनी पाटणामधील एका कार्यक्रमात एका व्हाईट पेंटिंगमध्ये रंगकाम केले होते. त्यामधील कमळ त्यांनी रंगवले होते. त्यानंतर बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. तसेच नितीश कुमार यांनी भाजपासोबत पुन्हा हातमिळवणी करत राज्यात एनडीएचे सरकार स्थापन केले होते. दरम्यान, आजच्या संदेशामधून नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपासोबत चांगले संबंध कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची सुरुवात काही दिवसांआधीच केली होती. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जेडीयू सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हरियाणामध्ये चौधरी देविलाल यांच्या जयंतीला निमंत्रण असूनही उपस्थित राहणे टाळले होते.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या या शुभेच्छा संदेशावर राजदने खोचक टीका केली आहे. नितीश कुमार हे गुजरातमधील परिस्थिती पाहून घाबरले आहेत. तिथे भाजपाने सर्व सरकारच बदलले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपाशी आणि मोदींशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे, असा टोला राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारPoliticsराजकारण