शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:55 IST

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू असून, शुक्रवारपासून पुढचा आठवडा काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था आणि शांततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शुक्रवारची नमाज आणि सोमवारी बकरी ईद असल्याने संचारबंदी काही काळासाठी शिथील करण्यात येणार आहे. मात्र या काळात कलम ३७० हटवण्याबाबत काश्मिरींच्या जनमानसाचा अंदाज येणार आहे. दरम्यान, राज्यात शांतता कायम राखण्यासाठी सुरक्षा दलांनी सुद्धा चोख रणनीती आखलेली आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये पाच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होणार आहेत. त्यामुळे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर या काळात काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती राहील. यावर सुरक्षा यंत्रणा आणि केंद्र सरकारची करडी नजर आहे.  ९ ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाचा वर्धापन दिन आहे, त्याच दिवशी शुक्रवारची नमाज असेल. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. तसेच १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असून, त्यानिमित्त १३ ऑगस्ट रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या दिवशी काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न होत असतो. 

 बकरी ईदपूर्वी हज यात्रेहून परतलेल्या यात्रेकरूंच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजनही होत असते. त्यातच काश्मीर खोरे हे मुस्लिम बहूल असल्याने या ठिकाणी बकरी ईद हा  मोठा सण असतो. त्यामुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर या सणानिमित्त बाजार उघडणार की बंद राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.  तर १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असून, यादिवशी स्वातंत्र्याचा जल्लोष काश्मिरी जनतेसह साजरा करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. तर १५ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील सर्व ४ हजार पंचायती आणि गावांमध्ये तिरंगा फडकवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू काश्मीरचा वेगळा ध्यज आता अस्तित्वात राहणार नाही. मात्र श्रीनगर येथील सचिवालयावर बुधवारीसुद्धा तिरंग्यासह राज्याचा ध्वज फडकत होता. हा ध्वज १३ जुलै १९३१ पासून फडकवला जात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारत