शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 2:54 PM

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू असून, शुक्रवारपासून पुढचा आठवडा काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था आणि शांततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शुक्रवारची नमाज आणि सोमवारी बकरी ईद असल्याने संचारबंदी काही काळासाठी शिथील करण्यात येणार आहे. मात्र या काळात कलम ३७० हटवण्याबाबत काश्मिरींच्या जनमानसाचा अंदाज येणार आहे. दरम्यान, राज्यात शांतता कायम राखण्यासाठी सुरक्षा दलांनी सुद्धा चोख रणनीती आखलेली आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये पाच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होणार आहेत. त्यामुळे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर या काळात काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती राहील. यावर सुरक्षा यंत्रणा आणि केंद्र सरकारची करडी नजर आहे.  ९ ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाचा वर्धापन दिन आहे, त्याच दिवशी शुक्रवारची नमाज असेल. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. तसेच १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असून, त्यानिमित्त १३ ऑगस्ट रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या दिवशी काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न होत असतो. 

 बकरी ईदपूर्वी हज यात्रेहून परतलेल्या यात्रेकरूंच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजनही होत असते. त्यातच काश्मीर खोरे हे मुस्लिम बहूल असल्याने या ठिकाणी बकरी ईद हा  मोठा सण असतो. त्यामुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर या सणानिमित्त बाजार उघडणार की बंद राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.  तर १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असून, यादिवशी स्वातंत्र्याचा जल्लोष काश्मिरी जनतेसह साजरा करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. तर १५ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील सर्व ४ हजार पंचायती आणि गावांमध्ये तिरंगा फडकवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू काश्मीरचा वेगळा ध्यज आता अस्तित्वात राहणार नाही. मात्र श्रीनगर येथील सचिवालयावर बुधवारीसुद्धा तिरंग्यासह राज्याचा ध्वज फडकत होता. हा ध्वज १३ जुलै १९३१ पासून फडकवला जात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारत