शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
3
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
4
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
5
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
6
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
7
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
8
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
9
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
10
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
11
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
12
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
13
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
14
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
15
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
16
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
17
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
18
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
19
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
20
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:07 IST

Extremely Severe Alert: केंद्र सरकारच्या सेल ब्रॉडकास्टची यशस्वी चाचणी, भारताने सज्ज केली स्वदेशी Extremely Severe Alert सिस्टिम. ही पूर्णपणे मेड इन इंडिया प्रणाली असून ती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने विकसित केली आहे. सामान्य मेसेजपेक्षा ही यंत्रणा वेगळी आहे.

Extremely Severe Alert: शनिवारी २ मे रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुंबईसह देशभरातील लाखो नागरिकांच्या मोबाईलवर अचानक एक जोरात सायरन वाजला आणि स्क्रीनवर इमर्जन्सी अलर्टचा मेसेज आला. अचानक झालेल्या या आवाजामुळे आणि मोबाईल व्हायब्रेट झाल्यामुळे सुरुवातीला नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा कोणताही धोका नसून केंद्र सरकारकडून करण्यात आलेली एक महत्त्वाची तांत्रिक चाचणी होती आणि याला सेल ब्रॉडकास्ट असे म्हणतात.

भारत सरकारच्या दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टमची चाचणी घेण्यात आली. नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी नागरिकांना तात्काळ सतर्क करण्यासाठी ही सिस्टिम तयार करण्यात आली आहे.

ही पूर्णपणे मेड इन इंडिया प्रणाली असून ती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने विकसित केली आहे. सामान्य मेसेजपेक्षा ही यंत्रणा वेगळी आहे. आपत्तीच्या काळात फोन लाईन्स जाम असल्या तरीही ही प्रणाली एकाच वेळी ठराविक क्षेत्रातील सर्व मोबाईलवर मेसेज पाठवू शकते. हा संपूर्ण प्रकल्प साचत या अलर्ट प्लॅटफॉर्मचा भाग आहे.

नागरिकांना घाबरण्याची गरज नाही

सरकारने स्पष्ट केले की, हा केवळ एक टेस्ट मेसेज होता. हा मेसेज मिळाल्यावर जनतेने घाबरून जाण्याची किंवा कोणतीही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. यंत्रणेची विश्वासार्हता तपासण्यासाठी हे मेसेज इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये पाठवले जात आहेत.

नेमका मेसेज काय होता?

भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकतानाही. हा एक चाचणी संदेश आहे – भारत सरकार” असं मेसेजमध्ये म्हटलं.

एकापेक्षा जास्त वेळा अलर्ट का येतो?

वेगवेगळ्या मोबाईल टॉवर्सची आणि नेटवर्कची क्षमता तपासली जात असल्याने, काही युजर्सना हा अलर्ट एकापेक्षा जास्त वेळा मिळू शकतो. हे पूर्णपणे सामान्य असून ही यंत्रणा योग्यरित्या काम करतेय की नाही हे तपासण्यासाठी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

"नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा"  या ब्रीदवाक्यासह सुरू झालेली ही सेवा भविष्यात मोठ्या आपत्तीच्या वेळी हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. एकदा का या चाचण्या पूर्ण झाल्या की, ही यंत्रणा ऑटोमॅटिकली काम करण्यास सुरुवात करेल. ज्यांच्या मोबाईलमध्ये सेल ब्रॉडकास्ट टेस्ट अलर्ट सुरू असेल त्यांनाच हे मेसेज मिळतील. फोनच्या Settings > Safety and Emergency > Wireless Emergency Alerts > Test Alerts मध्ये जाऊन ही सेवा सुरु करता येऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Loud siren on your phone? Don't panic, it's a government test!

Web Summary : A loud siren on phones nationwide was a government test of the cell broadcast alert system for disaster warnings. No action is needed; it tests system reliability. Multiple alerts may occur due to network testing. It aims to save lives during disasters.
टॅग्स :NDMAराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणSocial Viralसोशल व्हायरलSummerउन्हाळाHeatwaveउष्णतेची लाटRainपाऊसIndiaभारतsmsएसएमएसNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलCentral Governmentकेंद्र सरकार