शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

11 महीन्यानंतर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, शेतकऱ्यांनी केंद्राला पाठवली मृत शेतकऱ्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 15:13 IST

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होणार.

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी सरकारसोबत बैठक होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होण्याची शक्यता. युनायटेड किसान मोर्चा(SKM) ने शनिवारी MSP, कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि आंदोलकांवरील खटले मागे घेणे यासह प्रलंबित मागण्यांवर सरकारशी चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

सोमवारची ही बैठक तब्बल 11 महिन्यांनी होणार आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात या वर्षी जानेवारी महिन्यात शेवटची चर्चा झाली होती. गेल्या सोमवारी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले, त्यानंतर या बैठकीचा निर्णय झाला. कृषी कायदे परत करावेत आणि पिकांना किमान आधारभूत किंमत(MSP) कायदेशीर हमी द्यावी या मागणीसाठी शेतकरी गेल्या एक वर्षापासून आंदोलन करत आहेत.

5 सदस्यीय समितीमध्ये शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल, अशोक धावले, शिवकुमार कक्का, गुरनाम सिंग चादुनी आणि युधवीर सिंग यांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन संपवणार नाही. बैठकीत शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे, किमान आधारभूत किंमत कायद्यातील हमीभाव, नुकसानभरपाई आणि अन्य मागण्यांबाबतची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मृत 702 शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठवली

शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या 702 शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगितले होते. देशाच्या विविध भागांतील, विशेषतः पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर(सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डर) निदर्शने करत आहेत. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा