शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 2:54 PM

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, निवडणुकीत जिंकलो तर संविधान बदलू, त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला होता. भाजपा-एनडीएला 150 जागाही मिळणार नसल्याचा दावा राहुल यांनी केला.

ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचं राहुल म्हणाले. "एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहेत, जे संविधान नष्ट करू पाहत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे, जी संविधान वाचवण्यात मग्न आहे. भाजपाच्या लोकांना संविधान रद्द करून गरीब, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे, मात्र आम्ही आरक्षण कधीच संपू देणार नाही, आरक्षणावरील 50 टक्के मर्यादाही आम्ही हटवणार आहोत" असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. 

राहुल गांधी यांनी हातात संविधान घेऊन लोकांना सांगितलं की, "पंतप्रधान मोदींना हे (संविधान) काढून टाकायचं आहे आणि त्यांना फक्त राज्य करायचं आहे. त्यांना तुमचे सर्व अधिकार काढून घ्यायचे आहेत. हे त्यांचे ध्येय आहे आणि आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आदिवासी, मागासवर्गीय आणि दलितांना जे काही अधिकार मिळाले ते याचे (संविधान) योगदान आहे."

"भाजपाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, सत्तेत आल्यास ते हे बाजूला ठेवतील. त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला आहे. त्यांना 150 जागाही मिळणार नाहीत. त्यांचे नेते सांगत आहेत. ते आरक्षण काढून घेतील, आम्ही दलित, मागासवर्गीय आणि गरिबांना जितकं आरक्षण हवंय ते देऊ" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा