शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 2:43 PM

ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मसूद अजहरच्या मुद्दावरून राहुल गांधी यांनी मोदींना जाब विचारला आहे. जागतिक पातळीवर मसूद अजहरला अतिरेकी घोषित करण्यात आल्यानंतर या घोषणेमुळे काँग्रेसच्या पोटात दुखत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी एका सभेत केले होते. त्याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राष्ट्रवादावर बोलताना राहुल म्हणाले की, २००४ मध्ये काश्मीर जळत होते. त्यावेळी काँग्रेसने तेथील परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. मात्र मोदींनी तेथील स्थिती खराब केली. काँग्रेसने अतिरेक्यांवर अंकूश ठेवला होता. ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.

राष्ट्रीय सुरक्षा देशासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये काँग्रेसचा रेकॉर्ड उत्तम आहे. काश्मीरमधील आतंकवाद आम्ही रोखला. परंतु, मोदींनी आतंकवादासाठी देशाचे द्वार खुले करून दिले. मसूद अजहरला यांनीच सोडून दिले. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेसह बेरोजगारी देखील देशासमोरची मोठी समस्या आहे. मोदींनी देशाला बेरोजगारीच्या खाईत ढकलले. त्यावर मोदींकडे काही उत्तर आहे का, असा सवाल राहुल यांनी केला.

मोदींचा पराभव निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होणार हा देशाचा आवाज आहे. मोदींनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते शक्यही होते. मात्र आज देशात मागील ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. त्यांनी १५ लाखांचे आश्वासन दिले, पण ते देखील जुमला ठरले. आम्ही पाच वर्षांत ३ लाख ६० हजार, २२ लाख नोकऱ्या देणार आहोत. ही लढाई सत्याची आहे. आमच्या बाजूने सत्य आहे. त्यामुळे मोदींचा पराभव होणार असं, राहुल यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाmasood azharमसूद अजहर