शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 14:44 IST

ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मसूद अजहरच्या मुद्दावरून राहुल गांधी यांनी मोदींना जाब विचारला आहे. जागतिक पातळीवर मसूद अजहरला अतिरेकी घोषित करण्यात आल्यानंतर या घोषणेमुळे काँग्रेसच्या पोटात दुखत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी एका सभेत केले होते. त्याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राष्ट्रवादावर बोलताना राहुल म्हणाले की, २००४ मध्ये काश्मीर जळत होते. त्यावेळी काँग्रेसने तेथील परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. मात्र मोदींनी तेथील स्थिती खराब केली. काँग्रेसने अतिरेक्यांवर अंकूश ठेवला होता. ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.

राष्ट्रीय सुरक्षा देशासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये काँग्रेसचा रेकॉर्ड उत्तम आहे. काश्मीरमधील आतंकवाद आम्ही रोखला. परंतु, मोदींनी आतंकवादासाठी देशाचे द्वार खुले करून दिले. मसूद अजहरला यांनीच सोडून दिले. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेसह बेरोजगारी देखील देशासमोरची मोठी समस्या आहे. मोदींनी देशाला बेरोजगारीच्या खाईत ढकलले. त्यावर मोदींकडे काही उत्तर आहे का, असा सवाल राहुल यांनी केला.

मोदींचा पराभव निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होणार हा देशाचा आवाज आहे. मोदींनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते शक्यही होते. मात्र आज देशात मागील ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. त्यांनी १५ लाखांचे आश्वासन दिले, पण ते देखील जुमला ठरले. आम्ही पाच वर्षांत ३ लाख ६० हजार, २२ लाख नोकऱ्या देणार आहोत. ही लढाई सत्याची आहे. आमच्या बाजूने सत्य आहे. त्यामुळे मोदींचा पराभव होणार असं, राहुल यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाmasood azharमसूद अजहर