शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

आसामात कमळ केरळात डावे

By admin | Updated: May 20, 2016 09:22 IST

पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला. आसाममध्ये प्रथमच भाजपाचे कमळ फुलले. या पक्षाने भगवा उंचावत काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवली. तामिळनाडूत जयललितांनी निसटती का होईना, लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा प. बंगालमध्ये डाव्यांशी आघाडी करण्याचा प्रयोग फसला. बंगालमध्ये काँग्रेसशी समझोता करणाऱ्या डाव्या पक्षांनी (एलफडीएफ) ने केरळमध्ये तर काँग्रेसला सत्तेतूनच हटवले आहे.पुडुच्चेरीमधील मिळवलेली सत्ता हेच काय ते समाधान काँग्रेसला लाभले. आसाममधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर किती मोठा होता हे त्यांच्या टिष्ट्वटमधून दिसून आले. देशभरातील जनता भाजपावर विश्वास दाखवत आहे. सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासावर जनतेने दाखविलेला हा विश्वास असल्याचे पक्षाला वाटते, असे ते निकाल जाहीर होत असताना प्रतिक्रिया देताना म्हणाले. >मोदींच्या कामगिरीला पावतीदेशाने काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीला व ध्येयधोरणांना जनतेने जोरदार समर्थन दिल्याचे यातून दिसून येते. - अमित शहा, भाजपाध्यक्ष>जनतेचा निर्णय स्वीकारतोकाँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेपर्यंत कठोर मेहनत करेल. आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. निवडणुकीत विजयी पक्षांना शुभेच्छा देतो. - राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस>भ्रष्ट सरकारला धोबीपछाडकेरळातील विजय एलडीएफसाठी मोठा आहे. जनतेने भ्रष्ट सरकारला धोबीपछाड दिला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली जाणार आहे. - प्रकाश करात, माकपा नेते>ममतांचा विजय ऐतिहासिक...ममतांच्या तृणमूलने २०११मध्ये २९४पैकी १८४ जागा जिंकल्या होत्या. या वेळी या पक्षाने दुहेरी द्विशतकच पार केले. गेल्या वेळी तृणमूलशी युती करणाऱ्या काँग्रेसने प. बंगालमध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. या वेळी तृणमूलने स्वबळावर मिळविलेले यश ऐतिहासिक ठरते.भाजपाने आसाममध्ये केलेली निवडणूकपूर्व आघाडी कामी आल्याचे पाहता पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या राज्यांमध्ये तशाच प्रकारची रणनीती अवलंबली जाऊ शकते. राहुल गांधी यांचा आसाम आणि प. बंगालमधील प्रयोग पुरता फसल्यामुळे काँग्रेसला अधिक आत्मचिंतनाची गरज भासेल.>तामिळनाडूत भोपळाच, तरीही जयललितांची साथ!तामिळनाडूत भाजपाला या वेळीही खाते उघडता आले नाही, मात्र या पक्षाने केरळमध्ये प्रथमच पाय रोवले. प. बंगालमध्ये संख्याबळ वाढविले. जयललितांच्या विजयामुळे भाजपाला संसदेत अण्णाद्रमुकची साथ लाभेल.प. बंगालचा विकास डोळ्यांसमोर ठेवत ममता बॅनर्जीही या पक्षाला मदतीचा हात देऊ शकतात. जयललितांनी गेल्या वेळी २३४पैकी १५० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत त्यांचे संख्याबळ घटले आहे.