शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:59 IST

Indigo Crisis : इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय.

Indigo Crisis : देशातील आघाडीची एअरलाइन कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे देशभरात इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द झाल्याने प्रवाशांना आज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरुमधील इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. 

भावाचा मृत्यू, पण फ्लाइट रद्द झाल्याने...

अचानक फ्लाइट रद्द झाल्यामुळे विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. कोणाला इंटरव्ह्यूसाठी जायचे, तर कोणाला ऑफिसमधील अत्यावश्यक कामासाठी. अनेक जण लग्नसमारंभाला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले, तर काहींच्या कुटुंबात आपत्कालीन परिस्थिती उद्धभवली होती. अशातच, मुंबई विमानतळावरील एका प्रवाशाची व्यथा मन हेलावणारी होती. 

प्रवाशाने सांगितले की, त्याच्या भावाचा मृत्यू झाला असून, मृतदेह दुसऱ्या फ्लाइटने कोलकाता येथे पोहोचला आहे. पण, फ्लाइट रद्द झाल्यामुळे कुटुंबीय मुंबईतच अडकून पडले आहेत. प्रवाशांचे म्हणणे आहे की, त्यांना फ्लाइट रद्द किंवा रीशेड्यूल झाल्याची स्पष्ट माहिती दिली जात नाही. इंटरनॅशनल फ्लाइटने आलेल्या प्रवाशांनाही त्यांच्या बॅगेजबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याचा आरोप आहे.

अनेकांची महत्वाची कामे रखडली...

मुंबई-पटना फ्लाइटची वाट पाहत असलेले कुमार गौरव म्हणाले, मी कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारांसाठी मुंबई आलो होतो. आता त्यांना घेऊन परत पटना जायचे आहे, पण फ्लाइट रद्द झाल्याने आम्ही विमानतळावरच अडकलो आहोत. तर काल रात्री 3 वाजता बोस्टनहून मुंबईत आलेले रोहित यांनी सांगितले की, त्यांना हैदराबादला जायचे होते, पण त्यांची फ्लाइट रद्द झाली आणि त्यांचे बॅगेजही अद्याप मिळालेले नाही.

नेमकी समस्या कुठे? DGCA चा नवा नियम ठरला कारण

इंडिगोने फ्लाइट रद्द करण्याचे कारण म्हणून तांत्रिक बिघाड, खराब हवामान, गर्दी आणि क्रूची कमतरता यांचा उल्लेख केला होता. मात्र खरी समस्या DGCA च्या 1 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नव्या रोस्टर सिस्टममध्ये असल्याचे समोर येत आहे. या नियमांनुसार पायलट आणि क्रू मेंबर्सना अधिक विश्रांती देण्याची बंधने आणली गेली आहेत. या कठोर नियमांनंतर नोव्हेंबर महिन्यातच इंडिगोला 1,232 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या होत्या. भारतातील सर्वाधिक उड्डाणे करणारी एअरलाइन असलेल्या इंडिगोला, फ्लाइट्सची संख्या जास्त आणि क्रू उपलब्धता कमी असल्याने फ्लाइट शेड्यूल व्यवस्थापित करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच आज पुन्हा मोठ्या प्रमाणात फ्लाइट्स रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo flights cancelled; passenger stranded after brother's death in Kolkata.

Web Summary : Indigo faces crisis with numerous flight cancellations due to staff shortages. A passenger was stranded in Mumbai after his brother's death in Kolkata. New DGCA rules exacerbate scheduling issues.
टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानAirportविमानतळMumbaiमुंबई