शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भारत व पाकिस्तान पुन्हा एक होतील

By admin | Updated: December 27, 2015 02:42 IST

एक दिवस भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन देश पुन्हा एक होतील, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वास आहे. हे तिन्ही देश एक होतील, पण युद्धाच्या माध्यमातून नव्हे,

नवी दिल्ली : एक दिवस भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन देश पुन्हा एक होतील, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वास आहे. हे तिन्ही देश एक होतील, पण युद्धाच्या माध्यमातून नव्हे, तर लोकांच्या सद्भावनेतून (पॉप्युलर गुडविल) ते एक होतील, असे मत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारच्या रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी लाहोरला आकस्मिकपणे भेट दिली, त्याच रात्री माधव यांनी हे विधान केले. ‘लोकांना वाटत असेल तर (पॉप्युलर गुडविल) ६० वर्षांपूर्वी काही ऐतिहासिक कारणांमुळे वेगवेगळे झालेले हे तिन्ही भूभाग पुन्हा एकदा एकत्र येतील आणि पुन्हा अखंड भारत निर्माण होईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अद्यापही वाटत आहे,’ असे राम माधव म्हणाले. ते अल-जझीरा या दोहा येथील टीव्ही वाहिनीशी बोलत होते. ‘आरएसएसचा एक स्वयंसेवक या नात्याने माझेही असेच मत आहे,’ अशी पुष्टी माधव यांनी जोडली. याचा अर्थ आम्ही एखाद्या देशाशी युद्ध केले पाहिजे, त्या देशाला आपल्यात सामील करून घेतले पाहिजे असा नाही. हे तिन्ही देश एक दिवस पुन्हा एक होतील, याचा अर्थ आम्ही त्या देशांसोबत युद्ध करावे असा होत नाही. आपण युद्ध न करता लोकांच्या सहमतीने आणि सद्भावनेतून कोणत्याही देशाला आपल्यासोबत जोडू शकतो. असे घडू शकते, असेही माधव यांनी स्पष्ट केले. रा. स्व. संघाचे प्रचारक असलेले माधव पुढे म्हणाले, ‘भारत ही अशी भूमी आहे, की जेथे विशिष्ट जीवन मार्ग, विशिष्ट संस्कृती किंवा सभ्यतेचे आचरण केले जाते. आम्ही त्याला हिंदू असे संबोधतो. याला तुमची काही हरकत आहे काय? भारताची एकच संस्कृती, आम्ही एक आहोत, आम्ही एक राष्ट्र आहोत. आरएसएस ही संघटना एक विचारधारा असून ती ‘फॅसिस्ट’ नाही.ही भारताच्या सर्वाधिकारासाठी आहे आणि ही संघटना वा आक्रमक नाही.’राम म्हणाले, सरकारला बदनाम करण्यासाठी पुरस्कार वापसीवाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात लेखक व साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत. याबाबत विचारले असता माधव म्हणाले, काही मूठभर लोक संपूर्ण देशाच्या मताचे प्रतिनिधित्व करीत नसतात आणि पुरस्कार परत न करणाऱ्या व या पुरस्कार वापसीला पाठिंबा न देणाऱ्या साहित्यिक व लेखकांची संख्या मोठी आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी ही पुरस्कार वापसी आहे. एकप्रकारे हे लोक आपल्या चुकीच्या विरोध प्रदर्शनाने भारताला बदनाम करीत आहेत. राम उवाच:माधव यांचे हे वक्तव्य असलेला कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या लाहोर भेटीच्या पूर्वीच लंडनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता; पण हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री उशिरा दाखविण्यात आला.