शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता आल्यास न्याय योजना राबवून पारखणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 07:47 IST

केरळमध्ये न्याय योजना यशस्वी ठरल्यास काँग्रेसशासित अन्य राज्यांतही ही योजना राबविली जाईल.

कोट्टयम : काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार केरळमध्ये आल्यास किमान उत्पन्न योजना (न्याय योजना)  राबवून पारखली जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील जनतेला दिले. न्याय योजना यशस्वी होईल, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले. 

पुथूपल्ली विधानसभा मतदारसंघातील मनारकाड येथील एका नाक्यावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओम्मेन चंडी यांनी ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रचारादरम्यान राहुल गांधी उघड्या वाहनात होते. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही होते. न्याय योजनेंतर्गत वार्षिक ७२,००० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.  पुढे काय होणार आहे, हे आम्ही जाणून आहोत.  हा नवीन विचार आम्ही पारखून पाहणार आहोत. ही योजना गरिबीचा शेवट करणारी ऐतिहासिक योजना असल्याचे त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले  होते.

केरळमध्ये न्याय योजना यशस्वी ठरल्यास काँग्रेसशासित अन्य राज्यांतही ही योजना राबविली जाईल. गरिबीशी कसा लढा द्यावा, हे केरळ उर्वरित देशाला दाखविणार आहे, असेही ते म्हणाले. या आधी जाहीरसभेत राहुल गांधी म्हणाले की, आमचे सरकार आल्यास निर्धारित दिवसांत न्याय योजना सुरू करणार आहोत. नोटाबंदी, कोविड-१९ ची साथ आणि जीएसटीच्या सदोष अंमलबजावणीमुळे ढासळलेली भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधी