शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Stampede :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 09:34 IST

Hathras Stampede : हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

२ जुलै रोजी हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून आजतागायत बाबा एकदाही समोर आले नाहीत. याच दरम्यान भोले बाबांचे वकील ए के सिंह यांनी 'आज तक'वर दावा केला आहे की, बाबा कुठेही लपलेले नाहीत. या घटनेने बाबा खूप दुखावले आहेत. यानंतर भोले बाबांच्या वतीने पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दावा करण्यात आला.

भोले बाबांच्या या दाव्यांचा तपास करण्यासाठी, आज तकच्या टीमने हाथरस, एटा, जालेसर येथे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या पीडित कुटुंबांच्या घरांना भेट दिली. भोले बाबांनी लोकांना मदत केल्याच्या सर्व दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाबांकडून त्यांच्या घरी काही मदत आली का? बाबांच्या समितीने त्यांच्याशी संपर्कही केला का? या सर्व प्रकाराबाबत लोकांनी माहिती दिली आहे. 

हाथरस घटनेत ६५ वर्षीय चंद्रप्रभा यांना गमावलेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी टीम सर्वप्रथम एटाला पोहोचली. येथे राम दास यांनी सांगितलं की, भोले बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, परंतु आजनंतर ते बाबांच्या कोणत्याही सत्संगाला जाणार नाही आणि त्यांचं कधीही ऐकणार नाहीत.

जलेसर राज कुमार यांच्या घरी टीम पोहोचली. राजकुमार मजुरीचे काम करतो आणि बाबांची पूजाही करतो. तो पत्नी आणि १७ वर्षांची मुलगी खुशबूसोबत सत्संगाला आला होता. पण सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आजपर्यंत बाबांकडून कोणतीही मदत किंवा आश्वासन मिळालेलं नाही. मात्र, सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत मिळत आहे.

एका कुटुंबाची अवस्थाही बिकट असून रडत आहे. इथे एकाच घरातील दोन मुली बाबांच्या सत्संगाला गेल्या होत्या, पण त्या परतल्याच नाहीत. मीरा आणि सुधा अशी मुलींची नावं होती. आज तकशी बोलताना त्यांच्या आईने सांगितलं की, बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, माझ्या दोन्ही मुली गेल्या. सरकारकडून मदत आली आहे, पण बाबांच्या बाजूने कोणीही आलं नाही.

हाथरसमध्ये आता बाबांना देव मानणारे भक्त आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर बाबांना ढोंगी म्हणू लागले आहेत. ज्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, "दहा दिवस झाले, ना बाबा आले ना त्यांचं कोणी आलं. बाबा ढोंगी आहेत. बाबा काही चमत्कार करत नाहीत." आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश