शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

रस्त्यांवरील अपघातात हकनाक माणसे मरतात, त्याची आहेत ८ कारणे; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 08:57 IST

आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही. 

भारतात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वांत जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात होतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ का करीत असावेत?

  • १.  आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही. 
  • २. वाहतूक मंत्रालय नियम करून मोकळे होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आरटीओ, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस इ. यंत्रणांवर असते. ते  एखादा अपघात झाल्यानंतरच ॲक्शन मोडमध्ये येतात.
  • ३. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नसते.  पुरेसे रुंद, खड्डेविरहित रस्ते, डिव्हायडर, फुटपाथ, सिग्नल, साइन बोर्ड इ. सुविधा अद्ययावत नसतात.
  • ४. भारतीय लोकांचे वाइट टाइम मॅनेजमेंट! ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात तिथे ५ मिनिटे एक्स्ट्रा राखीव ठेवून निघाले पाहिजे; पण बहुतेक लोक ५ मिनिटे उशिराच निघतात. म्हणजे पोहोचायला १५ मिनिटे लागत असतील तर हे लोक १० मिनिटे बाकी असताना निघतात. मग वेळेवर पोहोचण्यासाठी नियम मोडण्याशिवाय पर्याय नसतो.
  • ५. बेजबाबदार आणि कायदा न जुमानणारे लोक  जेव्हा वाहतुकीचे नियम मोडतात तेव्हा ते नियम पाळणार्या लोकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो.  त्यांच्या मनातील कायद्याविषयीचा आदर आपसूकच कमी होतो.
  • ६. बऱ्याच लोकांना  वाहतुकीचे सगळे नियम माहीतच नसतात, कारण पैसे भरून वाहन चालक परवाना सहज मिळविता येऊ शकतो. 
  • ७. रस्त्यावर एकाच वेळी ताशी ५ किमी वेगाने चालणाऱ्या बैलगाडीपासून ते थेट ताशी २०० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा समावेश असतो. त्या प्रत्येकासाठी वेगळी लेन करणे शक्य नाही. त्यासाठी परिस्थितीनुसार वेग नियंत्रित ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे.
  • ८. अवजड वाहनांच्या चालकांना पुरेशी विश्रांती न मिळणे, त्यांची व्यसनाधीनता!  हे चालक अतिशय विपरीत परिस्थितीत, वेगवेगळ्या हवामानात रात्रंदिवस वाहने चालवीत असतात. महामार्गावर ठराविक अंतरावर चालक सुविधा केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे. 

- पंजाबराव देशमुख, औरंगाबाद

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू