शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

रस्त्यांवरील अपघातात हकनाक माणसे मरतात, त्याची आहेत ८ कारणे; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 08:57 IST

आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही. 

भारतात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वांत जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात होतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ का करीत असावेत?

  • १.  आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही. 
  • २. वाहतूक मंत्रालय नियम करून मोकळे होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आरटीओ, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस इ. यंत्रणांवर असते. ते  एखादा अपघात झाल्यानंतरच ॲक्शन मोडमध्ये येतात.
  • ३. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नसते.  पुरेसे रुंद, खड्डेविरहित रस्ते, डिव्हायडर, फुटपाथ, सिग्नल, साइन बोर्ड इ. सुविधा अद्ययावत नसतात.
  • ४. भारतीय लोकांचे वाइट टाइम मॅनेजमेंट! ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात तिथे ५ मिनिटे एक्स्ट्रा राखीव ठेवून निघाले पाहिजे; पण बहुतेक लोक ५ मिनिटे उशिराच निघतात. म्हणजे पोहोचायला १५ मिनिटे लागत असतील तर हे लोक १० मिनिटे बाकी असताना निघतात. मग वेळेवर पोहोचण्यासाठी नियम मोडण्याशिवाय पर्याय नसतो.
  • ५. बेजबाबदार आणि कायदा न जुमानणारे लोक  जेव्हा वाहतुकीचे नियम मोडतात तेव्हा ते नियम पाळणार्या लोकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो.  त्यांच्या मनातील कायद्याविषयीचा आदर आपसूकच कमी होतो.
  • ६. बऱ्याच लोकांना  वाहतुकीचे सगळे नियम माहीतच नसतात, कारण पैसे भरून वाहन चालक परवाना सहज मिळविता येऊ शकतो. 
  • ७. रस्त्यावर एकाच वेळी ताशी ५ किमी वेगाने चालणाऱ्या बैलगाडीपासून ते थेट ताशी २०० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा समावेश असतो. त्या प्रत्येकासाठी वेगळी लेन करणे शक्य नाही. त्यासाठी परिस्थितीनुसार वेग नियंत्रित ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे.
  • ८. अवजड वाहनांच्या चालकांना पुरेशी विश्रांती न मिळणे, त्यांची व्यसनाधीनता!  हे चालक अतिशय विपरीत परिस्थितीत, वेगवेगळ्या हवामानात रात्रंदिवस वाहने चालवीत असतात. महामार्गावर ठराविक अंतरावर चालक सुविधा केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे. 

- पंजाबराव देशमुख, औरंगाबाद

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू