शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांना १५ दिवसांत अनुदान द्या

By admin | Updated: May 31, 2016 05:59 IST

१४व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नागरी स्वराज्य संस्थांच्या अनुदानाची मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत राज्यांनी ती नगरपालिका आणि महापालिकांना चुकती करावी अन्यथा

नवी दिल्ली : १४व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नागरी स्वराज्य संस्थांच्या अनुदानाची मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत राज्यांनी ती नगरपालिका आणि महापालिकांना चुकती करावी अन्यथा या रकमेवर बँकेच्या दराने व्याज आकारले जाईल, अशी सक्त ताकीद केंद्राने राज्यांना दिली आहे.केंद्रीय नगरविकास खात्याचे सचिव राजीव गऊबा यांनी राज्यांना पाठविलेल्या परिपत्रकात हा इशारा दिला आहे. वर्ष २०१५-१६मध्ये दिलेल्या अनुदानाचा प्रत्यक्षात कशा प्रकारे विनियोग केला गेला याचे अहवाल राज्यांनी जूनअखेर सादर करावेत. अहवाल वेळेत न देणाऱ्या राज्यांवरही बँकेच्या दराने व्याज आकारणी केली जाईल, असेही त्यात नमूद केले गेले आहे.राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अग्रिम वार्षिक योजना तयार करून घेऊन त्याही केंद्राकडे पाठवाव्यात. पुढील वर्षापासून या योजनांनुसार कामांसाठी अनुदान देणे शक्य होईल, असेही गऊबा यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. अनुदानाचा योग्य प्रकारे आणि वेळेवर विनियोग व्हावा यासाठी राज्यांनी झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थांकडून मूल्यमापन करून घेण्याखेरीज मुख्य सचिवांच्या पातळीवर परिणामकारक निगराणी यंत्रणा निर्माण करावी, असेही राज्यांना सांगण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)निधीचा गैरवापर टाळा : अनुदानाची रक्कम नागरी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या शहरांमधील नागरी सुविधा वाढविणे व सुधारणे यासाठीच फक्त वापरतील व हा पैसा अन्य कोणत्याही कामांसाठी वापरला जाणार नाही किंवा त्याची गैरवापर होणार नाही, याकडे राज्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे केंद्राने बजावले आहे. रक्कम पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ते व फूटपाथ तसेच दफनभूमी व स्मशानभूमी अशा नागरी सुविधांवर खर्च करणे अपेक्षित आहे.