शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जल वाहतूक ठरतेय जीवघेणी! बोट दुर्घटनेत तब्बल 10 हजार 580 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 13:39 IST

भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देभारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. 2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे.

विजयवाडा - आंध्र प्रदेशमध्ये गोदीवरी नदीत प्रवासी बोट उलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी ही दुर्घटना घडली. बुडालेल्या बोटीतील 40 प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातील सांगली जिल्हातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण 17 जणांचा मृत्यू झाला होता. भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. National Crime Records Bureau (NCRB) ने याबाबत माहिती दिली आहे. 

2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. यामध्ये 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड या राज्यात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बोट दुर्घटनेत उत्तर प्रदेशात 1753, मध्य प्रदेश 1665, बिहार 1216, छत्तीसगड 864, तामिळनाडू 630, कर्नाटक 447, ओडीसा 386, केरळ 360 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे, लाईफ जॅकेट नसणे, विनापरवाना बोट चालवणे या गोष्टींमुळे बोट दुर्घटना घडत असल्याचं समोर येत आहे. आंध्र प्रदेशमधील बोट दुर्घटनेबाबत आंध्र प्रदेश आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये असलेल्या 61 प्रवाशांपैकी 50 जण पर्यटक होते. तर अन्य 11 जण हे बोटीवरील कर्मचारी होते. गोदावरी नदीजवळील पपीकोंडालू हिलचा नजारा पाहण्यासाठी ही मंडळी सहलीसाठी गेली होती. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहून किनारा गाठला. यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूIndiaभारत