शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

केजरीवाल यांच्या विजयाचे चार शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 4:55 AM

अविश्रांत परिश्रम; जोरात लढविला ‘आप’चा किल्ला

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांचे वर्णन आपचे सबकुछ असे स्थानिक नेते करतात. सरकार, पक्षाचा चेहरा ते असले, तरी निवडणूक प्रचारात चार शिलेदारांनी आपचा किल्ला मजबूत लढविला. मनीष सिसोदिया, आतिशी, गोपाल राय, सौरभ भारद्वाज यांच्याशिवाय आपचे यश अपूर्ण ठरते.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून मनीष सिसोदिया यांचे नेतृत्व पुढे आले. त्यांनीच शाळांचे मॉडेल विकसित केले. पारंपरिक विचारांचा पगडा असूनही त्यांनी कधीही आधुनिक विचारांशी गल्लत केली नाही. मित्रांशी वेदशास्त्रपुराणांवर चर्चा करणारे सिसोदिया कधीही अवैज्ञानिक भूमिका घेत नाहीत. केजरीवाल व मनीष सिसोदिया म्हणजे दोन विचार व एक निर्णय. पक्षांमध्ये असे समीकरण अभावानेच आढळते. भाजपमध्ये हे समीकरण मोदी-शहा जोडीचे आहे.

आतिशी परदेशात शिकल्यानंतर बड्या कंपनीतील नोकरी सोडून दिल्लीत परतल्या. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाचे माध्यम प्राथमिक, माध्यमिक शाळाच आहेत, हे त्यांनी पक्षाला पटवून दिले. नंतरच शाळांची स्थिती पालटली. गेल्या अडीच-तीन वर्षांत त्यांनी एकही वादग्रस्त विधान केले नाही. परदेशी शिष्टमंडळांना दिल्लीच्या शाळांत आणण्याचे कसबही त्यांनी दाखविले.

गोपाल राय हे पक्षात केजरीवाल व सिसोदियांहून लोकप्रिय आहेत, असे म्हणतात. पक्ष बांधला गोपाल राय यांनीच. त्यामुळेच केजरीवाल यांनी त्यांच्यावर ७० मतदारसंघातून प्रचारयात्रा काढण्याची जबाबदारी सोपविली. नेते-कार्यकर्ते-समर्थक-स्वयंसेवक अशी विभागणी केल्याने पक्षाची मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी झाली.

सरकार व पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणजे सौरभ भारद्वाज. प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याच्या हातोटीमुळे त्यांचे पक्षातील स्थान भक्कम झाले. मतमोजणी सुरू होताच आपकडून टीव्हीवर आले ते भारद्वाजच. उच्चविद्याविभूषित असल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. माध्यमांना न्यूज पुरविण्याची रणनीतीही त्यांनी उत्तम राबविली.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप