शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

Farmer's Agitation: चर्चा निष्फळ, कायदे मागे घेण्यावर सर्व संघटना ठाम; शेतकरी रॅली काढणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:30 AM

नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. 

विकास झाडे -नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे सर्वोत्तम आहेत. तरीही आम्ही ते काही काळ स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता यापेक्षा आम्ही अधिक काहीही करू शकत नाही, असे सांगत मंत्रीगटाने शेतकरी नेत्यांसोबतची बैठक आवरती घेतली. नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. आंदाेलकांची जोरदार तयारी - आंदोलनाला ५८ दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारचा निषेध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या रिंंगरोडवर ट्रॅक्टर रॅली काढण्याचे शेतकऱ्यांनी निश्चित केले आहे. शेतकऱ्यांची यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीला जाता यावे यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. ठिकठिकाणी रॅलीची रंगीत तालीमही सुरु आहे.प्रसारमाध्यमांकडे गेल्याने शेतकरी नेत्यांना सुनावले -शुक्रवारी विज्ञान भवनात शेतकरी नेते आणि मंत्रीगटासोबत अकरावी बैठक होती. दहाव्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना दिलेला कायदे स्थगितीचा प्रस्ताव फेटाळल्याने अस्वस्थ झालेले कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, सरकार कायदे रद्द करणार नाही. कायद्या सुधारणा हव्या तर सुचवा, ते दीड ते दोन वर्षांसाठी स्थगित करायचे असेल तर बोला. तुम्ही आतापर्यंत सहकार्य केल्याबाबत आभारी आहोत. आम्ही सन्मान म्हणून स्थगितीचा प्रस्ताव दिला परंतु तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. या प्रस्तावाबाबत तुम्ही मीडियाकडे न जाता आमच्याशी बोलू शकले असते, असेही तोमर यानी नेत्यांना सुनावले.पुढच्या बैठकीची तारीख ठरली नाही -केंद्रानेही आता कठोर भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांकडून जोपर्यंत सरकारकडे कोणताही प्रस्ताव जात नाही तोपर्यंत पुढची बैठक होणार नाही. तोमर यांनी तूर्तास कोणतीही बैठक नसल्याचे बैठकीनंतर सांगितले. आजच्या मंत्रीगटामध्ये वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री सोमप्रकाश यांचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ २० मिनिटे आजची अधिकृत बैठक चालली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली