शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 07:11 IST

लोकसभेत नेत्यांमध्ये रंगले, ‘वंदे मातरम्’वरून वाक् युद्ध

नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षपूर्ती झाल्याचे निमित्ताने विरोधी पक्ष काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर जोरदार टीका केली. प. बंगालच्या विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सरकारने ‘वंदे मातरम्’वर चर्चा घडवून आणली आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हेतू असल्याचा आरोप केला.

आपले उद्दिष्ट काय आहे, लोकांसाठी आपली जबाबदारी काय आहे, आपण ती कशी पूर्ण करत आहोत, या विषयांपेक्षा आपण राष्ट्रीय गीतावर चर्चा का करत आहोत, त्यावर कशी चर्चा होऊ शकते, असा खडा सवाल प्रियांका गांधी यांनी सरकारला विचारला. तुम्ही आम्हाला भूतकाळात डोकं खुपसून ठेवायला लावू इच्छिता कारण सरकारला वर्तमान आणि भविष्यकाळात पाहायचे नाही पंतप्रधानांचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे, त्यांची धोरणे देशाला कमकुवत करत चालल्याचा आरोपही त्यांनी केला.

वंदे मातरम् केवळ गाण्यासाठी नाही 

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश सिंह यांनी लोकसभेत चर्चेत भाग घेताना ‘वंदे मातरम् केवळ गाण्यासाठी नाही, तर आचरणातही असायला हवे,’ असे नमूद केले. मात्र, आज फुटीरवादी लोक या माध्यमातून देशात फूट पाडू इच्छित असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, ‘वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात मिळालेली ऊर्जा आजही या गीताच्या माध्यमातून तेवढीच प्रखर असल्याचे लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनी नमूद केले. चर्चेच्या प्रारंभी प्रस्तावनेत त्यांनी हे विचार मांडले.

‘वंदे मातरम्’च्या शताब्दी वर्षात आणीबाणी लागू करून काँग्रेसने देशाला अंधाराच्या दरीत लोटले, असे भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले. तर, तेलुगू देसमचे खासदार बी. बायरेड्डी शबरी यांनी या राष्ट्रीय गीतामधून देवी दुर्गाचा उल्लेख आणि ‘कमला’सारखे शब्द का काढले, हा प्रश्न बंगालमधील तृणमूल सरकार काँग्रेसला का विचारत नाही, अशा शब्दांत टीका केली.

या गीताने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले; मग चर्चेची गरज काय?

‘वंदे मातरम्’ची पहिली दोन कडवी राष्ट्रीय गीत म्हणून घेण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे घटना समिती आणि तिच्या सदस्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे.

आपण ज्या विषयावर चर्चा करत आहोत तो देशाच्या आत्म्याचा एक भाग आहे. जेव्हा आपण वंदे मातरम् चा उल्लेख करतो, तेव्हा आपल्याला आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची आठवण होते. या गाण्याने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे; मग चर्चेची गरज काय?

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांवर नवे आरोप करण्यासाठी सरकारला ही चर्चा हवी होती. तुम्ही नेहरूंबद्दल बोलत राहता, तर एक काम करूया, चर्चेसाठी वेळ निश्चित करूया, त्यांच्यावर झालेल्या सर्व अपमानांची यादी करूया. त्यावर चर्चा करूया आणि हा विषय एकदाचा बंद करूया.

‘वंदे मातरम’वर अन्याय

ही तर तुष्टीकरणाच्या राजकारणाची सुरुवात

‘वंदे मातरम’वर झालेला अन्याय ही साधारण घटना नव्हती. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा हा प्रारंभ होता, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेतील चर्चेत आक्रमकपणे भूमिका मांडली. याच कारणामुळे शेवटी देशाचे विभाजन झाल्याचेही ते म्हणाले.

‘वंदे मातरम’ला जो न्याय मिळायला

हवा होता तो मिळाला नाही हे सत्य स्वीकारले पाहिजे. स्वतंत्र भारतात राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीतास समान दर्जा देण्याचे ठरले होते. परंतु, ‘वंदे मातरम’ तोडण्यात आले, असे सिंह म्हणाले.

हे राष्ट्रीय गीत परिपूर्ण आहे, परंतु ते अपूर्ण ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. या महान राष्ट्रीय गीताची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. वंदे मातरम असो किंवा बंकिमचंद्र चटर्जी यांची ‘आनंदमठ’ कादंबरी असो, या दोन्ही कलाकृती कधीच विशिष्ट धर्माच्या विरोधात नव्हत्या.

टॅग्स :ParliamentसंसदPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस