शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात का?

By admin | Updated: September 14, 2016 05:23 IST

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे श्रेयस्कर ठरेल का याविषयी केंद्र सरकारने नागरिकांकडून साधक-बाधक मते मागविली आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे श्रेयस्कर ठरेल का याविषयी केंद्र सरकारने नागरिकांकडून साधक-बाधक मते मागविली आहेत.सर्वसामान्य नागरिक, खासदार आणि अमदारांसह लोकप्रतिनिधी, घटनातज्ज्ञ, अभ्यासक, सनदी अधिकारी आणि समाजमाध्यमांवर प्रभाव टाकणाऱ्यांसह सर्वच इच्छुक व्यक्तींनी आपली मते myGov.com या वेबसाइटवर नोदवावी, असे आवाहन सरकारने केले आहे. यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

देशात लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी मांडली होती व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही त्यास अनुकुलता दर्शविली होती. या पार्श्वभूमीवर हा विषय पुढे नेण्यापूर्वी सरकार त्यावरील विचारमंथनात नागरिकांना सहभागी करून घेत आहे.

नागरिकांना हे आवाहन करताना त्यासोबत दिलेल्या एका टिप्पणीत म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या योग्यायोग्यतेवर विविध पातळीवर चर्चा झाली आहे. त्यातून असे मत दिसून आले की, एकाच वेळी निवडणुका घेतल्याने मतदारांचा उत्साह टिकून राहील एवढेच नव्हे तर, त्यामुळे निवडणुकांसाठी सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल आणि प्रशासकीय कामांची पुनरुक्तीही टळेल.

हे टिप्पण म्हणते की, यामुळे निवडणुकांवर होणारा राजकीय पक्षांचा खर्चही कमी होईल. शिवाय प्रत्येक वेळी स्वतंत्र निवडणूक घेताना आचारसंहिता लागू होण्याने सरकारी कामांचा जो खोळंबा होतो, तोही होणार नाही. एकाच वेळी निवडणुका घ्यायचे ठरविले तर त्यासाठी सुरळित व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेतील निवडणुकांसंबंधीच्या ८३, १७२, ८५ व १७४ या अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्याखेरीज इतरही बदल करावे लागतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.