शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:16 IST

उत्तरेतील राज्यात भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, खरं आव्हान पुढच्या वर्षी असणार आहे. भाजपचे दक्षिणेतील तीन राज्यात सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे. 

हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार... लागोपाठ चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली. बिहारमध्ये भाजपला मागील निवडणुकीप्रमाणेच मोठं यश मिळालं आहे. आता भाजपचे लक्ष्य २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर असून, चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशापैकी दोन ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मात्र, तीन राज्यात भाजपचे सत्तेचे अजूनही अपूर्ण आहे. 

पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी महत्त्वाच्या आहेत. 

तामिळनाडू विधानसभा

दक्षिणेतील एक महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षामध्येच सत्तेसाठी चुरस असते. द्रमुक पक्षाची काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर छोट्या पक्षांसोबत आघाडी आहे. अण्णा द्रमुकने भाजपसोबत युती केली आहे. तामिळनाडूमध्ये ताकद वाढवण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहे, पण त्यात अजूनही यश आले आहे. 

अण्णा द्रमुकसोबत युतीमध्ये सत्ता मिळाल्यास भाजपला तामिळनाडूमध्ये पक्ष संघटन मजबूत करता येणार आहे. त्यामुळेच भाजपला तामिळनाडूमध्ये सत्ता मिळवणे महत्त्वाचे आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभा

भाजप गेल्या काही वर्षांपासून जे राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, ते आहे पश्चिम बंगाल! बिहार विधानसभेचा निकाल लागताच भाजपच्या नेत्यांनी पुढे लक्ष्य पश्चिम बंगाल म्हणण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे राज्य आहे. 

ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी भाजपकडून गेल्या काही वर्षांपासून व्यूहरचना केली जात आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्येही जंगलराजचा उल्लेख करणे सुरू केले आहे. तीन दशके सत्तेत राहिलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस आता राज्यात फार प्रभावी राहिलेले नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस पार्टी अशीच लढत बघायला मिळणार आहे. 

केरळ विधानसभा 

दक्षिणेतील असे राज्य जिथे भाजप आपली मूळ रोवण्याचे प्रयत्न करत आहे. पण, पक्षाला अद्यापही अपेक्षित यश मिळालेलं नाही. केरळमध्येही प्रत्येक पाच वर्षांनी सत्तांतर होते. पण, गेल्यावेळी हा परंपरा खंडित झाली. डाव्या पक्षाच्या आघाडीला दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यश आले. 

केरळ राज्य भाजपबरोबर काँग्रेससाठीही महत्त्वाचे आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी तीव्र स्पर्धा होण्याचीच जास्त शक्यता आहे. पण, भाजपलाही केरळमध्ये चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. 

आसाम विधानसभा 

मागील दहा वर्षांपासून आसामध्ये भाजपची सत्ता आहे. तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्याकडून सातत्याने धुव्रीकरणावर भर दिला जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसही आसामच्या सत्तेसाठी प्रयत्नशील आहे. पण, काँग्रेससाठी ही लढाई सोपी नाही. 

पुद्दुचेरी विधानसभा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे नेते एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार आहे. गेल्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले होते. भाजपचे सहा आमदार आहेत. ३० आमदार असलेल्या विधानसभेसाठी एनडीए रंगास्वामींच्या नेतृत्वाखालीच सामोरी जाणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Elections 2026: Will BJP conquer South India? Focus on three states.

Web Summary : After successes in Haryana, Maharashtra, Delhi, and Bihar, BJP eyes the 2026 elections, aiming to expand its power in Tamil Nadu, West Bengal, and Kerala. While Assam and Puducherry are also key, the southern states remain a challenge.
टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूwest bengalपश्चिम बंगालKeralaकेरळAssamआसामcongressकाँग्रेस