शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

लॉकडाऊन काळात पनवेल परिसरात माणुसकीची भिंत धुळीच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:26 PM

गेल्या सहा महिन्यांपासून या भिंती धूळखात फडून आहेत. तीन महिन्यांपासून अनलॉक झाले, तरी या भिंतीवर कोणत्याही प्रकारे साहित्य मिळत नाही. भिंती अडगळीत पडले आहेत

कळंबोली : पनवेल महापलिका क्षेत्रात कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल या परिसरात माणुसकीच्या भिंतीची संकल्पना नागरिकांकडून रुजवण्यात आली. त्यानुसार, पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तर कळंबोली एनएमटी बसस्थानकाजवळ या भिंतीचे अनावरण करण्यात आले, परंतु कोरोनामुळे या भिंती ओस पडल्या आहेत. त्या धूळखात पडून आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून या भिंती धूळखात फडून आहेत. तीन महिन्यांपासून अनलॉक झाले, तरी या भिंतीवर कोणत्याही प्रकारे साहित्य मिळत नाही. भिंती अडगळीत पडले आहेत. याकडे दानशूर नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. पावसामुळे भिंती खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी तर कचरासुद्धा साठला आहे. गरजू व गरिबांना आधार देणाऱ्या भिंतीवरली माणुसकी हरवली आहे. कळंबोली एनएममटी बसस्थानकाजवळ या भिंतीवर कित्येक गरीब वस्तू घेऊन जात असत, पण आता तीच भिंत अडगळीत पडली आहे. अनलॉक झाले असले, तरी नागरिकातील मनस्थिती स्थिर राहिली नाही. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे कळंबोली येथील रहिवासी राहुल भोसले यांनी सांगितले. या उपक्रमाला जिवंत ठेवण्यासाठी माणुसकीच्या भिंतीला, माणुसकीचा आधार देणे फारच गरजेचे बनले आहे.महापालिकेने लक्ष देण्याची गरजपनवेल महापालिका, तसेच रोटरी क्लब यांच्या वतीने माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू केला होता. यास प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाला. सद्य परिस्थितीत या भिंतीवर बोरी झाडांच्या फांद्यात वाढ झाल्यामुळे फांद्यात भिंत हरवली आहे. हा परिसर, तसेच भिंत सभोवताली साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई