शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Delhi Violence: दिल्लीत हिंसाचार घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातून आले होते ३०० लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:18 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : दोषींची गय केली जाणार नाही

शीलेश शर्मा नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करण्यासाठी उत्तर प्रदेशातून तीनशे लोक आले आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील हिंसाचारावरील चर्चेला उत्तर देताना लोकसभेत केला.

चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्ली पोलीस आणि गृहमंत्र्यांवर आरोप करीत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तीन दिवस दिल्ली जळत असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. गृहमंत्री काय करीत होते? पंतप्रधान अजूनही काही बोलत नाहीत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनाच का पाठविण्यात आले? हिंसाचारग्रस्तांचे अश्रू पुसण्याची गृहमंत्र्यांची जबाबदारी नव्हती का? दिल्लीतील हिंसाचार हा लाजिरवाणा कलंक असून, याला गृहमंत्रालय सर्वस्वी जबाबदार आहे.

चौधरी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनीही गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.७०० एफआयआर दाखल चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांंनी सांगितले की, दिल्लीतील हिंसाचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. जगापुढे खरे आले पाहिजे. दिल्ली पोलिसांना शब्बासकी देत त्यांनी दिल्ली पोलिसांवरील आरोप फेटाळले. माझ्या सूचनेनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोबाल यांना पाठविण्यात आले होते. पूर्ण घटनाक्रम सांगत त्यांनी दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी केव्हा काय-काय प्रयत्न करण्यात आले, याची तपशीलवार माहिती दिली. आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल करण्यात आले असून, २,६४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा अटक करण्यात आलेली आहे. एक गौप्यस्फोट करताना गृहमंत्री म्हणाले की, लोकांकडून मिळालेले व्हिडिओ तपासले जात आहेत.गृहमंत्र्यांनी सत्य नाही सांगितले - अधीर रंजनगृहमंत्र्यांचे निवेदन संपत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत सभात्याग केला. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणारे निवेदन केले. सत्य सांगितले नाही. आमच्या चुकीमुळे घडले, यापुढे असे होऊ देणार नाही, असे त्यांना म्हणता आले असते. दिशाभूल करणारे निवेदन ऐकायचे नसल्याने आम्ही सभात्याग केला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेस